शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
2
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
3
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
4
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
5
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
6
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
7
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
8
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
9
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
10
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
11
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
12
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
13
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
14
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
15
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
16
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
17
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
18
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
19
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर

१.४0 लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन

By admin | Published: October 12, 2015 1:56 AM

४५ हजार क्विंटल बियाण्याची मागणी.

अकोला: जिल्ह्यात यावर्षीच्या रब्बी हंगामात १ लाख ४0 हजार ३00 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. रब्बी पेरणीसाठी ४५ हजार ३१६ क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे.जिल्ह्यातील रब्बी पेरणीची सरासरी १ लाख ७ हजार १५६ हेक्टर एवढी आहे. सरासरीच्या तुलनेत यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात १ लाख ४0 हजार ३00 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन जिल्हा कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यामध्ये गहू, हरभरा, करडी, मका व सूर्यफूल इत्यादी पीक पेरणीच्या क्षेत्राचा समावेश आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी ४५ हजार ३१६ क्विंटल बियाण्याची मागणी जिल्हा कृषी विभागामार्फत राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे.दहा हजार क्विंटल बियाण्याचा पुरवठा!ल्ल रब्बी हंगामात जिल्ह्यातील पेरणीसाठी ४५ हजार ३१६ क्विंटल बियाण्याची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. त्यापैकी ९ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात १0 हजार २५१ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामध्ये रब्बी ज्वारी ५0 क्विंटल, गहू ५३0 क्विंटल, हरभरा ९ हजार ४७१ िक्वंटल, करडई १८५ क्विंटल व सूर्यफूल १५ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.१२ हजार मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध!रब्बी हंगामासाठी कृषी विभागामार्फत ७४ हजार ७00 मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी ९ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात १२ हजार ६७२ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये युरिया ९३७ मेट्रिक टन, डीएपी १ हजार ५२३ मेट्रिक टन, एमओपी २ हजार ४0९ मेट्रिक टन,एसएसपी ७00 मेट्रिक टन, संयुक्त खते ६ हजार ६६३ मेट्रिक टन व मिश्र खते १५४ मेट्रिक टन ख तसाठय़ाचा समावेश आहे.