शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

पाऊस घडीभर, वीज पुरवठा खंडित रात्रभर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:14 AM

संतोषकुमार गवई पातूर: पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होणे, हे समीकरण पातूर तालुक्यात कायम रुजले आहे. तालुक्यातील महावितरणचा ...

संतोषकुमार गवई

पातूर: पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होणे, हे समीकरण पातूर तालुक्यात कायम रुजले आहे. तालुक्यातील महावितरणचा कारभार वाऱ्यावर असून, नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. याकडे महावितणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

पातूर तालुक्यातील दुर्गम भागातील गावांचा वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याची बाब नित्याचीच झाली आहे. त्यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. तसेच वीज कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याच्या गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी दुसऱ्या दिवसाची दुपार उजाडते. ग्रामीण भागातील गावागावात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने खासगी अप्रशिक्षित वीजसंबंधी कामे करतात. तालुक्यात कृषी फिडर अद्यापही स्वतंत्र करण्यात आलेले नाही. त्यामुळे वीज ग्राहकांचा वीज पुरवठा रात्र रात्रभर खंडित असतो. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

--------------------------

ट्रान्सफार्मर व कर्मचाऱ्यांची संख्या कमीच

पातूर तालुक्यात ट्रान्सफार्मरची संख्या कमी असल्याने वीज वहनाचा अधिभार अधिक आहे. जुन्या झालेल्या तारा वारंवार तुटत असतात. तसेच महावितरणकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने दुरुस्तीसाठी वेळ जातो. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. सायंकाळी पाऊस आल्यानंतर तेवढ्याच तत्काळ वीज पुरवठा खंडित होतो.

-----------------

पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होतो. दिवसा खंडित झालेला वीज पुर‌वठा रात्रभर सुरळीत होत नसल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा.

दीपक इंगळे, ग्रामस्थ, भंडारज बु.

---------------------------------

गावातील वीज पुरवठा खंडित तर होतोच, त्याचबरोबर शेतीची वीज पुरवठा खंडित होत असल्याने सिंचनासाठी अडचण जात आहे. कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

- शंकर जाधव, रेशीम शेतकरी, पांगरताटी.