शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

रब्बी पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा विक्रमी सहभाग, ९१,७४२ शेतकऱ्यांनी केली नोंदणी

By रवी दामोदर | Published: December 17, 2023 5:15 PM

गतवर्षीच्या केवळ १४ हजार शेतकऱ्यांचा सहभाग

अकोला : यंदा खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेत केवळ १ रुपयामध्ये सहभाग घेता आला. परिणामी, यंदा आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडून काढीत शेतकऱ्यांनी विक्रमी सहभाग नोंदविला. यंदा रब्बी हंगामात दि. १४ डिसेंबरपर्यंत तब्बल ९१ हजार ७४२ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला असून, गतवर्षी केवळ १४ हजार २४९ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता.

पेरणीपासून पीक काढणीपर्यंतच्या कालावधीत गारपीट, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ, पावसातील खंड आदी नैसर्गिक संकटांमुळे पीक उत्पादनाची हानी होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून पीकविमा योजना राबविण्यात येते. यंदा पीकविमा योजनेकरिता नोंदणीकृत शेतकऱ्यांचा विमा हप्ता राज्य सरकार भरत असल्यामुळे योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एका रुपयात नोंदणी करता येत होती. परिणामी, यंदा रब्बी हंगामात ९१ हजार ७४२ शेतकऱ्यांची विक्रमी नोंदणी झाली आहे. पीकविमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांकडून १ हजार ९४९, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांकडून १ लाख ३२ हजार १६६ नोंदणी केल्या आहेत.

१.४४ लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित

यंदा रब्बी हंगामात विक्रमी ९१ हजारांवर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून, तब्बल १ लाख ४४ हजार ४७४ हेक्टर क्षेत्रावरील पिके संरक्षित केले आहे. यंदा पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. भरपाई म्हणून विमा कंपन्यांकडून २५ टक्के अग्रीम रक्कम दिली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा रब्बी हंगामातील पिकांसाठी पीकविमा नोंदणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पीक शेतात बहरलेले असताना, अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे नुकसानाची पुर्वसूचना केली असून, भरपाई देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी