शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
3
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
4
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
5
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
6
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
7
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
8
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
9
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
10
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
11
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
12
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
13
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
14
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
15
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
16
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
17
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
18
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
19
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
20
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका

दुष्काळातही शेतसारा वसुली!

By admin | Published: December 06, 2015 2:28 AM

अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना सवलती केव्हा मिळणार?

अकोला: जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी सरासरी ४२ पैसे जिल्हा प्रशासनमार्फत जाहीर करण्यात आली. पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी, शासनामार्फत दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी सवलती अद्याप जाहीर करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही जिल्ह्यात शेतकर्‍यांकडून शेतसार्‍याची वसुली करण्यात येत आहे. या पृष्ठभूमीवर दुष्काळी दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थितीत दिल्या जाणार्‍या सवलती केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर्षी पावसाळय़ात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीपाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून, कपाशीचे उत्पादनही एकरी चार क्विंटलच्यावर पोहोचले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. यावर्षीच्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील सातही तालुक्यातल्या लागवडी योग्य ९९७ गावांमधील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी ७ नोव्हेंबर रोजी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ९९७ गावांची खरीप पिकांची सरासरी पैसेवारी ४२ पैसे म्हणजेच ५0 पैशांपेक्षा कमी आहे. खरीप पिकांच्या पैसेवारीचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाले; मात्र शासनामार्फत अद्यापही जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला नसून, दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना द्यावयाच्या विविध सवलतीही जाहीर करण्यात आल्या नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून शेतसारा वसूल करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीत शासनामार्फत दिल्या जाणार्‍या जमीन महसुलात सूट व इतर सवलतींचा लाभ जिल्ह्यातील शेतकर्‍यांना केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.