शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...तर रिलायन्सच्या सात हजार पोलच्या प्रस्तावाला मंजुरी नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 12:12 IST

मनपाने आकारलेला दंड कंपनीने जमा न केल्यास रिलायन्सच्या सात हजार पोलच्या प्रस्तावाला मंजुरी देणार नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे.

ठळक मुद्देअनधिकृतपणे फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी महापालिका प्रशासनाच्या विद्युत विभागाने अनधिकृत केबल जप्त करण्याची कारवाई केली होती.मनपासह महावितरण कंपनीची परवानगी आवश्यक असून, खासगी कंपन्यांनी या दोन्ही यंत्रणांची परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे.

अकोला: महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय करणाºया रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने प्रशासनाच्या १२ लाख रुपयांच्या दंडात्मक रकमेला ‘खो’ दिल्याचे समोर आले आहे. यादरम्यान, शहरात सात हजार पोलच्या माध्यमातून घराघरांत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे पसरविण्यासाठी कंपनीने मनपाक डे प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. जलवाहिनी फोडल्याप्रकरणी मनपाने आकारलेला दंड कंपनीने जमा न केल्यास रिलायन्सच्या सात हजार पोलच्या प्रस्तावाला मंजुरी देणार नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे.शहरात महावितरण कंपनीचे विद्युत पोल, मनपाचे पथदिवे असणारे खांब तसेच काही नागरिकांच्या इमारतींवर काही कंपन्यांकडून अनधिकृतपणे फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी महापालिका प्रशासनाच्या विद्युत विभागाने अनधिकृत केबल जप्त करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर सत्ताधारी भाजपाने स्थानिक केबल संचालकांना दिलासा देत महापालिकेचे खांब व इमारतींवरून केबल टाकण्यासाठी शुल्क आकारणीचा प्रस्ताव मंजूर केला. यामध्ये एक रुपया खांब आणि इमारतीसाठी १० रुपये असे शुल्क आकारण्यात आले. तत्पूर्वी काही मोठ्या कंपन्यांनी शहरात अनधिकृतरीत्या केबल टाकल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या घरापर्यंत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकण्याचे काम शहरातील अग्रवाल व मित्तल नामक खासगी व्हेंडरने घेतली आहे. सदर केबलचे जाळे टाकण्यासाठी मनपासह महावितरण कंपनीची परवानगी आवश्यक असून, खासगी कंपन्यांनी या दोन्ही यंत्रणांची परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे. अशा स्थितीत शहरात फोर-जी सुविधेसाठी केबलचे जाळे टाकणाºया रिलायन्स इन्फोकॉम कंपनीने मनपाकडे सात हजार पोल उभारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ५४० पोल उभारल्या जाणार असून, त्या पोलच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत फायबर केबलचे जाळे टाकण्यात येणार आहे. सदर पोल महापालिकेला एलईडी पथदिव्यांसाठी वापरता येणार असून, त्या मोबदल्यात मनपाला महिन्याकाठी आर्थिक स्वरूपात भाडे दिल्या जाणार असल्याची माहिती आहे. हा प्रस्ताव लक्षात घेताच प्रशासनाने जोपर्यंत रिलायन्स कंपनीकडून १२ लाखांचा दंड जमा केला जात नाही, तोपर्यंत या प्रस्तावाला मंजुरी देणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

दंड भरण्यास टाळाटाळ!मनपाची मुख्य जलवाहिनी फोडणाऱ्या रिलायन्स कंपनीला दंडापोटी १२ लाख रुपये जमा करणे मोठी बाब नाही. कंपनी दंड जमा करीत नसल्याचे पाहून मनपाने खदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी कंपनीविरोधात गुन्हे दाखल केल्यावरही कंपनीने दंड जमा न केला नाही. ही बाब पाहता कंपनीला स्थानिक राजकारण्यांचा वरदहस्त असल्याचे बोलल्या जात आहे. कंपनीला आकारलेला दंड कमी करावा, यासाठी महापालिकेतील भाजपाचे पदाधिकारी आग्रही असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशनmahavitaranमहावितरण