शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
3
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
4
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
5
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
6
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
7
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
9
जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम 
10
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
11
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
12
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
13
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
14
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
15
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
16
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
17
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
18
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
19
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

संकटात सापडलेल्या शेतक-यांच्या भावना कळवा!

By admin | Published: August 18, 2015 1:29 AM

पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना.

संतोष येलकर/अकोला: अत्यल्प पावसामुळे विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर गावागावात भेटी देऊन, संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या भावना कळवा, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना केल्या आहेत. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यातील २५ हजार ६४ गावांमधील पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी निघाली. याशिवाय नोव्हेंबर-डिसेंबर व फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानापोटी शेतकर्‍यांना मदत व सवलती देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी, यावर्षीच्या पावसाळ्यातही राज्यातील बहुतांश भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक भागात पेरण्या उलटल्या असून, दुबार पेरणीपासूनही शेतकर्‍यांना फारशा आशा नाहीत. भरीस भर, काही जिल्हय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध नाही. राज्यात दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत काही निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती शेतकर्‍यांना देण्यासाठी, तसेच संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना धीर देण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात संबंधित पालकमंत्र्यांनी काही गावांना प्रत्यक्ष भेटी द्यावी आणि शेतकर्‍यांच्या भावना कळवाव्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना १0 ऑगस्ट रोजी एका पत्राद्वारे दिल्या. *प्रत्यक्ष गावभेटीतून पालकमंत्री देणार योजनांची माहिती! मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्हय़ांचे पालकमंत्री संबंधित जिल्हय़ातील काही गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन, शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती देऊन संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना धीर देणार आहेत. २0१४-१५ मध्ये शेतकर्‍यांनी घेतलेल्या अल्पमुदती कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतर करून, कर्जाचा हप्ता परत करणार्‍या शेतकर्‍यांच्या कर्जावरील व्याज २0१५-१६ या वर्षात माफ करण्यात येणार आहे. त्यापुढील चार वर्षांचे ६ टक्के दराने होणारे व्याज शासनामार्फत बँकांना देण्यात येणार आहे.