शहरं
Join us  
Trending Stories
1
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
2
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाला मविआला इशारा 
3
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
4
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
5
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
6
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
7
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
9
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
10
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
11
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
12
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
13
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
14
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
15
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
16
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
17
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
18
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
19
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
20
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!

पैसेवारी कमी करण्याचा घेणार ठराव!

By admin | Published: October 12, 2015 1:57 AM

शेतक-यांसाठी ग्रामपंचायती सरसावल्या; शासनाकडे करणार पाठपुरावा.

सायखेड (जि. अकोला ): निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत तीन वषार्ंपासून दुष्काळाचा सामना करणार्‍या बाश्रीटाकळी तालुक्यातील शेतकर्‍यांना मदत मिळण्यासाठी आता तालुक्यातील ११ पेक्षा जास्त ग्रामपंचायत सरसावल्या आहेत. शासनाने पैसेवारीचे निकष बदलून ५0 पैशाचे आत पैसेवारी जाहीर करावी आणि दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना न्याय द्यावा, असा ठराव मासिक सभेत घेण्यात येणार आहे. हा ठराव महसूल विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांनी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या सोयाबीनखक पीक फुलोरा अवस्थेत असून, पावसाने दडी मारल्यामुळे उत्पादन कमालीचे घटले आहे. तालुक्यातील बहुतांश भागातील पीक परिस्थिती अत्यंत बिकट असून, मशागत, पेरणी, निंदण, बियाणे, खते, डवरणी, फवारणी आदींवर झालेला खर्चही भरून निघणार नसल्याने शेतकरी पुरता खचला आहे. बाश्रीटाकळी तालुक्यात धाबा, राजंदा, पिंजर, महान, बाश्रीटाकळी, खेर्डा या सहा महसूल मंडळामध्ये १५९ गावांचा समावेश आहे. धाबा मंडळातील सर्वाधिक गावांना पीक उत्पादनात फटका बसला असून, तालुक्या तील काही भाग वगळता पिकांची स्थिती बिकट आहे. अपुर्‍या पावसामुळे चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शेतकर्‍यांना शासनाकडून भरीव मदत मिळण्यासाठी ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. तालुक्यातील गावांमधील पैसेवारी ५0 पैशाच्या आत जाहीर करून जाहीर करून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशा असा ठराव मासिक सभेत घेण्यात येणार आहे.