शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

तेल्हारा तालुक्यात रोहित्र चोरीचा पुन्हा सपाटा

By admin | Published: May 03, 2017 7:26 PM

वानच्या ११९ कूपनलिका ठरताहेत निकामी

तेल्हारा : वान प्रकल्पाचे पाणी ज्या शेतशिवारात पोहोचत नाही, तेथे लघुसिंचन विभागाने ११९ कूपनलिका केल्या. त्याकरिता २५ क्षमतेचे ६५ रोहित्र बसविले होते. त्यातील दोन सोडता सर्वच रोहित्र चोरीला गेले. पुन्हा त्या जागी लावण्यात आलेल्या नवीन रोहित्र चोरीचा सपाटा सुरू आहे. यामधील १० रोहित्र पुन्हा चोरीला गेले. तपास मात्र शून्य आहे.तालुका बागायती क्षेत्रात मोडत असल्याने सिंचन जास्त प्रमाणात आहे. या ठिकाणी सिंचन करण्यासाठी शेतकरी मोठ्या पोटतिडकीने मेहनत घेताना दिसतो. हनुमान सागर नावाने ओळखल्या जाणाऱ्या वान प्रकल्पाने या भागात हरितक्रांती केली आहे. त्याद्वारे मागणीनुसार नेहमी सिंचनासाठी पाणी देण्यात येते व ज्या भागात पाटसऱ्यांचे पाणी पोहोचत नाही, त्या शेतशिवारात वान प्रकल्पाने लघुसिंचन विभागाकडून ११९ कूपनलिका करून दिल्या. एका कूपनलिकेवर २० एकर बागायती क्षेत्र क्षमतेचे सिंचन होते. याकरिता विद्युत विभागाकडून २५ क्षमतेचे ६५ रोहित्र बसविले; परंतु गेल्या तीन वर्षांत चोरांनी सर्वाधिक रोहित्र चोरून नेले. चोरीला गेलेल्या रोहित्राचा तपास लागला नाही. याबाबत तत्कालीन आमदार संजय गावंडे यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न विचारला होता. तो चांगलाच गाजला होता. त्यानंतर चोरीला गेलेल्या रोहित्राचा निधीसुद्धा मंजूर झाला व आमदार प्रकाश भारसाकळे यांनी हा प्रश्न गंभीरतेने घेतल्याने पुन्हा रोहित्र बसविले गेले; मात्र नव्याने लावण्यात आलेल्या रोहित्रामधील १० रोहित्र या आठवड्यातच चोरीला गेले. यामध्ये ग्रामीण भाग दोनमधील सहा व ग्रामीण भाग एकमधील चार रोहित्रांचा समावेश आहे. तेल्हारा व हिवरखेड पोलीस स्टेशनांतर्गत झालेल्या या चोरीचा तपास मात्र अद्याप सुरूच आहे. रोहित्र चोरी गेल्यामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते,याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. शेतशिवारातीलच रोहित्र चोरीस गेली आहेत व जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.