शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी विसर्ग!

By admin | Published: May 02, 2017 1:43 AM

महान- ६४ खेडी गावांना व मूर्तिजापूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, करिता मागणीनुसार दर दहा दिवसांनंतर महान धरणातून सिंचन व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

महान : खांबोरा उन्नई बंधाऱ्याची पाणी पातळी खोलवर गेल्याने ६४ खेडी गावांना व मूर्तिजापूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, करिता मागणीनुसार दर दहा दिवसांनंतर महान धरणातून सिंचन व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. वरिष्ठांच्या आदेशावरून ३० एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता महान धरणाच्या दोन्ही सिंचन व्हॉल्व्हमधून पाणी सोडण्यात आले. पाणी सोडल्यानंतर धरणात २९ टक्के जलसाठा उपलब्ध होता. महान धरणाचे सोडलेले पाणी खांबोरा उन्नई बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यास जवळपास दीड ते दोन दिवस लागते. पाणी पोहोचल्यावर महान धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात येणार असल्याचे महान पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. धरणातून सोडलेले पाणी ६४ खेडी व मूर्तिजापूर शहर व गुरे-ढोरांसाठी आहे. याचा उपयोग शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामासाठी घेता येणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. महान धरणातून पाण्याचा विसर्ग ३१ मार्चपासून पूर्णपणे बंद करण्यात आला होता; परंतु खांबोरा उन्नई बंधाऱ्यावरून ६४ खेडी गावांसह मूर्तिजापूर शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा असल्याने महान धरणातून सर्वप्रथम १० एप्रिल ,२० एप्रिल व ३० एप्रिल असे एका महिन्यात दर दहा दिवसांनी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. सध्या महान धरणात एकूण २९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे; तसेच अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महान धरणात एकूण पाच व्हॉल्व्ह बसविलेले असून त्यापैकी दुसरा व्हॉल्व्ह पाण्यावरती उघडा पडला आहे. धरणातील सोडलेले पाणी खांबोरा उन्नई बंधाऱ्यापर्यंत पोहोचल्यावर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडणे बंद करण्यात येईल. धरणातील जलसाठ्याकडे उपविभागीय अधिकारी बोरगाव मंजुचे नितनवरे, शाखा अभियंता सय्यद, जानोरकर, पिंपळकर, पाठक, शिराळे, हातोलकर, अकबर, शहा, अ. अजीज हे लक्ष ठेवून व्यवस्थित नियोजन करीत आहेत.