शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

अकोला जिल्ह्यात संततधार; सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 10:46 IST

आणखी चार दिवस सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अकोला : जिल्ह्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. विदर्भ व लगतच्या भागात चक्रवात तयार झाले आहे. मान्सूनच्या नोंदीने चढता आलेख गाठला आहे. गत तीन दिवसांपासून संततधार कोसळणारा पाऊस शुक्रवारीही ठाण मांडून बसून होता. या पावसामुळे काटेपुर्णा प्रकल्पातून विसर्ग सुरू झाला असून, आणखी चार दिवस सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मागील १५ - १८ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजली होती. कपाशी, सोयाबीन व इतर पिकांवर किडींनी हल्ला चढविला होता. मंगळवारपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. गत चार दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी, नाले वाहू लागले आहेत. या पावसामुळे शेतातील कपाशी, तूर, सोयाबीन पिकातही पाणी साचू लागले आहे. शुक्रवारीही पावसाचा जोर कायम असून, दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. जिल्ह्यात मागील २४ तासांत ६.८ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

चार दिवसांत ७० मिमी. पाऊस

जिल्ह्यात मंगळवारपासून सतत पाऊस बरसत आहे. ऑगस्ट महिन्यात सोमवारपर्यंत २२.७ मिमी पाऊस झाला होता. तर शुक्रवारी सकाळपर्यंत ९३.३ मिमी पाऊस बरसला. जिल्ह्यात गत चार दिवसांमध्ये ७०.६ मिमी पावसाची नोंद झाली.

 

ऑगस्टमधील तालुकानिहाय पाऊस

तालुका पाऊस (मिमी)

अकोट             ७७.१

तेल्हारा             ७७.९

बाळापूर             ८४.०

पातूर             १५७.२

अकोला             ९०.५

बार्शीटाकळी ८४.८

मूर्तिजापूर             १००.४

 

काटेपुर्णा ९३, तर वान ६६ टक्के भरले!

जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असलेल्या काटेपुर्णा प्रकल्पात ९३.७५ टक्के, तर वान प्रकल्पात ६६.६४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. वान प्रकल्पाच्या क्षेत्रात सतत पाऊस सुरूच असल्याने पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. काटेपुर्णाची २ वक्रव्दारे ३० सेंमी उंचीने उघडली आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस