शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सरपंचाचा पंचायत समिती कार्यालयात आत्महदहनाचा प्रयत्न; अंगावर ओतले डिझेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 20:00 IST

Sarpanch attempts self imolation सरपंच किशोर नाईक यांनी ९ नोव्हेंबर रोजी पंचायत विभागात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देकृती आराखडा पाठविण्यासाठी पंचायत समितीकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप उपस्थितीत नागरीकांच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला

मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्राम पोही येथील विकास कामांसंदर्भात पंचायत समितीला जिल्हा परिषदकडे कृती आराखडा पाठविण्यासाठी येथील सरपंच किशोर नाईक यांनी वारंवार विनंती करूनही सदर प्रस्ताव पाठविण्यासाठी विस्तार अधिकारी बी. पी. पजई यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली, असा आराेप करत सरपंच किशोर नाईक यांनी ९ नोव्हेंबर रोजी ५ वाजताच्या दरम्यान पंचायत विभागात अंगावर डीझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

             रोहणा बॅरेज या प्रकल्पात पोही येथील अनेक शेतकऱ्यांची शेती गेली आहे. या गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. गावाचे पुनर्वसन करायचे असल्याचे कारण पुढे करून या गावाचा विकास कृती आराखडा पाठविण्यास पंचायत समिती स्तरावर विस्तार अधिकारी (पंचायत) बी. पी. पजई हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सरपंच किशोर नाईक यांनी केला आहे. शासनाने अत्यावश्यक

विकास कामे थांबविता येणार नसल्याचे २६ में २००५ रोजी एका परिपत्रकात नमूद केले आहे. तरीसुद्धा या गावाचे नाव विकास कृती आराखड्यातून वगळण्यात आले होते. यासाठी सरपंच किशोर नाईक यांनी तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांना व विस्तार अधिकारी पजई यांना वारंवार विनंती केली असता, विविध कारणे सांगून टाळाटाळ करण्यात येत आहे. यासाठी विस्तार अधिकारी पजई यांनी अनेक अटी समोर केल्या. विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी व पाठबंधारे विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आणण्यासाठी वेठीस धरले, तेही प्रमाणपत्र सरपंचांनी विस्तार अधिकाऱ्याकडे सादर केले, तरीही आराखडा जिल्हा परिषद अकोला यांना पाठविण्यात येत नसल्याने गावाचा विकास थांबला आहे, त्यामुळे कंटाळून टोकाची भूमिका घ्यावी लागल्याचे सरपंच किशोर नाईक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

 यासंदर्भात उपजिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन मागीतले त्यांनी केलेल्या मार्गदर्शनात्यानुसार २६ मे २००५ च्या परिपत्रकानुसार कारवाई करण्यात येऊन सदर प्रस्ताव आजच जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येत आहे, मी दोन दिवसांपूर्वीच रुजू झाल्याने या प्रकरणी अनभिज्ञ होतो. यापुढे कोणावरही अन्याय होणार नाही.- बालासाहेब बायसगटविकास अधिकारी, पंचायत समिती, मूर्तिजापूर सदर प्रस्ताव पाठविण्यासाठी तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविला होता. यावर त्यांनी उपजिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्याकडे मार्गदर्शन मागीतले व यासाठी परवानगी दिली. हा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच तयार करण्यात आला असून सुट्टी असल्याने तो पाठविता आला नाही.- बी. पी. पजईविस्तार अधिकारी, (पंचायत)

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर