शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

तीन दिवसांपासून शिरपूर अंधारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:20 AM

शिरपूर-पिंपळखुटा मार्गावरील शिरपूर येथे सिंगल फेजच्या रोहित्राची थातुरमातुर दुरुस्ती केल्याने, वारंवार जळून वीजपुरवठा खंडित होत आहे, तसेच रोहित्र जळाल्याने ...

शिरपूर-पिंपळखुटा मार्गावरील शिरपूर येथे सिंगल फेजच्या रोहित्राची थातुरमातुर दुरुस्ती केल्याने, वारंवार जळून वीजपुरवठा खंडित होत आहे, तसेच रोहित्र जळाल्याने गेल्या तीन दिवसांपासून गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे गाव अंधारात आहे. गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला असून, पीठ गिरण्या बंद पडल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. शेजारी असलेल्या गावातून दळण व पाणी आणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने, गावात जागोजागी घाणीचे साम्राज्य असल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. अशातच अंधारात रात्र काढावी लागत आहे. संबंधित वरिष्ठांनी त्वरित दखल घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

शिरपूर येथे तीन दिवसांपासून रोहित्र जळाल्याने गाव अंधारात आहे. गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नदीतील दूषित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. परिणामी, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

- मोहम्मद आसिम, ग्रामस्थ, शिरपूर.

ग्रामस्थांना पिण्यासाठी दूषित पाणी

तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नदीतील दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब लक्षात घेता, त्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

अभियंत्यांकडून दखल नाही!

याबाबत ग्रामस्थांनी संबंधित उपकेंद्राच्या कनिष्ठ अभियंता यांच्याशी वारंवार संपर्क साधून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली, परंतु कनिष्ठ अभियंता यांच्याकडून अद्यापही दखल घेण्यात आली नाही. परिणामी, गेल्या तीन दिवसांपासून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.

यापूर्वी घडल्या चोरीच्या घटना

वीजपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे सर्पदंश, तसेच चोरीची घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही गेल्या काही महिन्यांआधी वीजपुरवठा खंडित असल्यामुळे अनेक चोरीच्या घटना घडल्या होत्या.

180921\img20210722164021.jpg

फोटो