शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

धक्कादायक : ‘कोरोना’बाधितांना मिळतेय दूषित पाणी अन् निकृ ष्ट जेवण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 10:21 AM

पिण्यासाठी दूषित पाणी अन् निकृ ष्ट जेवण पुरविल्या जात असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून येत आहेत

ठळक मुद्देदूषित पाणी प्यायला दिले जात असल्याची धक्कादायक माहिती काही रुग्णांनी सांगितली आहे.जेवणही निकृ ष्ट दर्जाचे दिले जात असल्याने बहुतांश रुग्ण बाहेरून जेवण मागवित असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सर्वोपचार रुग्णालयातील अस्वच्छता ही नेहमीचीच समस्या आहे; मात्र कोरोनासारख्या या महामारीमध्येही रुग्णालयातील अस्वच्छता कोरोनाबाधित रुग्णांसाठी डोकेदुखी ठरत आहे. एवढेच नव्हे, तर या रुग्णांना पिण्यासाठी दूषित पाणी अन् निकृ ष्ट जेवण पुरविल्या जात असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून येत आहेत; परंतु रुग्णालय प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही रुग्णांकडून केला जात आहे.जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. विशेषत: शहरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचा संपूर्ण ताण सर्वोपचार रुग्णालयावर येत आहे. अशा परिस्थितीत सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाला मनुष्यबळाची कमी जाणवत आहे. त्यामुळे अस्वच्छतेची समस्या रुग्णांना सतावत आहे. दुसरीकडे रुग्णांना दूषित पाणी प्यायला दिले जात असल्याची धक्कादायक माहिती काही रुग्णांनी सांगितली आहे. जेवणही निकृ ष्ट दर्जाचे दिले जात असल्याने बहुतांश रुग्ण बाहेरून जेवण मागवित असल्याची माहिती आहे. याप्रकरणी कोरोनाबाधित रुग्णांनी डॉक्टर किंवा परिचारिकांकडे तक्रारीदेखील केल्या आहेत; पण रुग्णांच्या या तक्रारीकडे रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रुग्णांकडून होत आहे. विशेष म्हणजे, काही रुग्णांनी थेट लोकप्रतिनिधींनाही याबाबत कल्पना दिली आहे. याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही.

वैद्यकीय तपासणीतही टाळाटाळकोरोनाबाधित रुग्णांच्या तपासणीच्या बाबतीतही टाळाटाळ होत असल्याचा आरोप येथील रुग्णांनी केला आहे. मंगळवारी संध्याकाळी काही रुग्णांना त्यांची रक्त तपासणी आणि ‘ईसीजी’ सकाळी होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते; परंतु बुधवारची सायंकाळ झाली, तरी त्यांचे रक्त नमुने घेण्यात आले नसल्याचा आरोप रुग्णांकडून होत आहे.

रुग्ण बाहेरूनच मागवताहेत जेवणसर्वोपचार रुग्णालय प्रशासनातर्फे दिले जाणारे जेवण निकृ ष्ट असल्याने आम्ही बाहेरूनच जेवण बोलावत असल्याचे कोरोना वॉर्डात दाखल रुग्णांचे म्हणणे आहे. शिवाय, काही रुग्ण हे त्यांच्या घरून जेवण मागवित असल्याचीही माहिती आहे.रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीप्रकरणी तक्रारी आल्या असून, त्या प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करू . याप्रकरणी जीएमसी प्रशासनाला सूचना दिल्या जातील. रुग्णांच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे.- प्रा. संजय खडसे, उपजिल्हाधिकारी, अकोला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय