शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी किंमत मोजावी लागेल..!! इस्रायलवर मिसाईल हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहूंचा इशारा
2
“११ कोटी जनतेचे लाडके नेते उद्धव ठाकरेंकडे पुन्हा राज्याची सूत्रे, मुख्यमंत्री...”: संजय राऊत
3
राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोन दिवसांचा वेळ का घेतला? मंत्री आतिशी यांनी स्पष्टच सांगितलं!
4
'राहुल गांधी देशातील नंबर-1 दहशतवादी', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे वादग्रस्त वक्तव्य
5
"मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख..."; ठाकरेंचा चंद्रचूड यांना टोला
6
₹184 चा शेअर ₹6 वर आला, गुंतवणूकदारांना केलं कंगाल; आता देतोय बंपर परतावा, महिनाभरात 80% नं वधारला!
7
तुम्हीही UPI चा वापर करता? पुढच्या आठवड्यापासून होणार मोठा बदल
8
“जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपा सरकारचे, काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा लागू करू”
9
48 तासांचं रहस्य काय...? तत्काळ राजीनामा न देण्यावरून भाजपचा केजरीवालांवर निशाणा
10
“२२ वर्षे आमदार, ८४ हजार पेन्शन, मोदी घरी बसले असते तर...”: ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
11
नितीन गडकरींनी केला गौप्यस्फोट; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "ते पंतप्रधान झाले तर..."
12
धक्कादायक! एका आठवड्याभरात तब्बल १९ हत्या; 'या' देशात घडला थरकाप उडवणारा प्रकार
13
जय श्रीराम! १८० दिवसांत ११ कोटी भक्तांनी घेतले रामललाचे दर्शन; ३३ कोटी पर्यटकांची युपीला भेट
14
मुंबईत पुन्हा हिट अँड रन; दहिसरमध्ये भरधाव कारमुळे १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; एक जखमी
15
अमेरिकेतून ऑर्डर मिळताच या ₹25 च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या! देतोय बंपर परतावा
16
मंगळवारी अनंत चतुर्दशी: बाप्पाचे विसर्जन करणे योग्य की अयोग्य? शास्त्र काय सांगते? वाचा
17
अनंत चतुर्दशी: शेषशायी विष्णूंचे दर्शन; ४०० वर्षांचा इतिहास, दृष्टांत झाला अन् अनंत प्रकटला
18
भाजपला विधानसभा निवडणुकीआधी विदर्भात धक्का! गोपालदास अगरवाल पुन्हा काँग्रेसमध्ये
19
"जनता आपल्या हातावर, मेरा केजरीवाल...", राघव चड्ढांकडून दीवार चित्रपटातील डॉयलॉगचा उल्लेख!
20
अरविंद केजरीवालांनी राजीनामा दिल्यास दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? 'ही' ५ नावं आघाडीवर...

हवामान बदलासाठी १० जिल्हे अतिसंवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 3:01 AM

राज्यात यंत्रणा मात्र सुस्त : अतिवृष्टी, महापुराचे संकट

अकोला : जागतिक वातावरणीय बदलामुळे राज्याचे सरासरी तापमान वाढणार असून, त्याचा प्रथम फटका बसण्याची शक्यता असलेल्या राज्यातील दहा जिल्हे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये बदलासाठी अनुकूल ठरणाऱ्या उपाययोजना राबविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे; मात्र सर्वच पातळीवर सामसूम असल्याचे चित्र सध्यातरी आहे.

वातावरणातील बदलांमुळे मुख्यत: अनियमित पाऊस, तीव्र दुष्काळ, मोठे पूर, जमिनीतील पोषक द्रव्यांचा असमतोल, वॉटर लॉगिंग, अन्न सुरक्षा, रोगराईत होणारी वाढ, जंगल व पाण्याची उपलब्धता यावर मोठे परिणाम होणार आहेत. आकस्मिक अतिवृष्टीने महापूर येणे किंवा काही ठिकाणी दुष्काळ पडणे, या घटनांमध्येही वाढ होत आहे. अतिसंवेदनशील जिल्ह्यांत प्रथम क्रमांक नंदुरबारचा आहे. त्यापाठोपाठ धुळे, बुलडाणा, जळगाव, हिंगोली, नाशिक, जालना, गोंदिया, वाशिम व गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे.

संभाव्य परिणामांना सामोरे जाण्यासाठी केंद्र शासनाने २००८ मध्येच राष्ट्रीय वातावरणीय बदल कृती आराखडा राज्यांना दिला. त्या आराखड्यानुसार उपाययोजना राबविण्याचे निर्देश आॅक्टोबर २०१७ मध्ये राज्याच्या पर्यावरण विभागाने दिले. आराखड्यामध्ये वातावरणात होणाºया बदलांचा फटका बसणाºया जिल्ह्यांचा क्रमही ठरविण्यात आला. राज्यातील जिल्ह्याचा संवेदनशील निर्देशांकही ठरला आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार नियोजन करून जिल्हास्तरीय अनुकूलन आराखडे तयार करणे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी निधी प्राप्त करून घेणे, प्रकल्पांची अंमलबजावणी करणे, त्यासाठी पर्यावरण व नियोजन विभागाशी समन्वय ठेवण्याचेही बजावण्यात आले; मात्र आराखडाही नाही, अंमलबजावणीही नाही, अशीच स्थिती सर्वत्र असल्याचे चित्र आहे.सर्व विभागांचा समन्वय साधण्याचा प्रयत्नपर्यावरणासंदर्भातील जिल्ह्यातील सांख्यिकीय माहितीनुसार वनविभाग, पर्यावरण विभागाकडून उपाययोजनांना सुरूवात केली जाईल. पुढील काळात उपाययोजना अधिक गतीने करण्यासाठी पाठपुरावा तसेच सर्व विभागांचा समन्वय साधला जाईल.- हृषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम. 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस