शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

जनसामान्यांच्या अडचणी सोडवा, संघटित व्हा, एकत्र या; दिलीप वळसे पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

By आशीष गावंडे | Updated: October 4, 2023 22:14 IST

शेतीसाठी व वैयक्तिक कर्ज सुविधा देण्यासाठी सहकार कायद्यात सुधारणा करणार असल्याचे सहकार मंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.

आशिष गावंडे, अकोला: जनसामान्यांच्या समस्या व अडचणी समजून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचा. त्यासाठी संघटित हाेऊन एकत्र येण्याचे आवाहन सहकार मंत्री तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. 

राज्याचे सहकार मंत्री तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (अजित पवार गट) नेते दिलीप वळसे पाटील अकोला शहरात बुधवारी सायंकाळी दाखल झाले असता त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी आयाेजित केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा तसेच आढावा बैठकीला मार्गदर्शन केले. अवघ्या पाच ते सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश वळसे पाटील यांनी दिले. पक्ष संघटन मजबूत करून प्रत्येक प्रभागासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची सूचनाही त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केली. आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक आहोत. त्यामुळे भूतकाळात न जाता अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाला बळ देण्याचे काम करावे, असे सहकार मंत्री वळसे पाटील म्हणाले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण, माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र शिंगणे, विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी विचार व्यक्त केले. व्यासपीठावर माजी आमदार तुकाराम बिडकर, वाशिम जिल्हाअध्यक्ष युसुफ पुंजवाणी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, महानगराध्यक्ष विजयराव देशमुख, निखील ठाकरे, रायुकाॅंचे शहर अध्यक्ष अजय मते आदी उपस्थित होते. 

सहकार कायद्यात सुधारणा करणार

शेतीसाठी व वैयक्तिक कर्ज सुविधा देण्यासाठी सहकार कायद्यात सुधारणा करणार असल्याचे सहकार मंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समित्या, सेवा सहकारी साेसायट्यांचे कामकाज पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरु राहील, त्यामध्ये काेणताही नवीन बदल केला जाणार नसल्याचे सांगत वळसे पाटील यांनी आश्वस्त केले. दरम्यान, काही दिवसांपासून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम होत आहे. अशावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी वादग्रस्त प्रकरणांमध्ये लक्ष न देता एकाेप्याने राहण्याची गरज असल्याचे सहकार मंत्री वळसे पाटील यांनी नमुद केले.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटील