शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
4
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
7
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
8
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
9
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
10
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
11
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
12
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
13
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
14
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
15
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
16
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
17
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
18
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
19
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
20
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात पावसाअभावी केवळ १.३८ टक्के क्षेत्रात पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 11:07 IST

Sowing in only 1.38 per cent in Akola District : अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा असून शेतकरी चिंतित आहे.

अकोला : यंदा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन लवकर झाले; परंतु बहुतांश तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने जिल्ह्यात केवळ १.३८ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा असून शेतकरी चिंतित आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. जवळपास शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदी केली असून आता दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. आज ना उद्या पाऊस पडेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पाऊसच नसल्याने जमिनीत ओल मुरलेली नाही. यावर्षी जिल्ह्यात केवळ ५०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अपेक्षित पेरणीही झाली नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १.३८ टक्के म्हणजेच ६ हजार ६७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक सिंचन क्षेत्र उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

अकोला, मूर्तिजापूर व बाळापूर तालुक्यात अत्यल्प पेरणी

पावसाअभावी जिल्ह्यात केवळ १.३८ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये अकोला ०.०४ टक्के, मूर्तिजापूर ०.०५ टक्के, बाळापूर ०.२ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. पातूर सर्वाधिक ४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

 

जिल्ह्यात केवळ ५०.३ मिमी पाऊस

मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मागील १५ दिवसांत जिल्ह्यात केवळ ५०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी ७७.० टक्के पाऊस झाला होता.

अकोट तालुक्यात सर्वात कमी पाऊस

मागील १५ दिवसांमध्ये झालेल्या पावसात अकोट तालुक्यात सर्वात कमी २७.३ मिमी नोंद झाली आहे. तर मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक ८५.३ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ पातूर तालुक्यात ८१.९ मिमी पाऊस झाला.

 

आतापर्यंत झालेला पाऊस

५०.३ मिमी

आतापर्यंत झालेल्या पेरणी

१.३८ टक्के

पेरणीची घाई नको!

इतर जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडत आहे; परंतु अकोला जिल्ह्यात पावसाची दमदार सुरुवात झाली नाही. सध्या पेरणीसाठी लगबग सुरू असून शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिमी इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा आवाहन कृषी विभागाने केले आहे. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते.

 

यंदा कपाशी पेरणीचे नियोजन केले आहे; परंतु पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी रखडली आहे. अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

- किशोर मोरे, शेतकरी

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीRainपाऊस