शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

सोयाबीन वाढले, पण फुलो-याचे प्रमाण घटले!

By admin | Published: August 18, 2015 1:32 AM

अनोळखी किडींचा प्रादुर्भाव वाढला.

अकोला : ऑगस्ट महिन्यात आलेल्या पावसाने विदर्भातील ६0 टक्के सोयाबीन पिकांची वाढ झाली आहे. सोयाबीनच्या झाडांना पुरक फुलोरा येत नसल्याचे चित्र असून, अचानक या पिकावर अनोळखी कीड आल्याने शेतकरी हादरले आहेत. या नवीन किडीने शास्त्रज्ञांपुढेही आव्हान उभे केले आहे. दीड महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर पावसाचे पुनरागमन झाल्याने सोयाबीनसह इतर पिकांची वाढ झाली असली तरी चांगले उत्पादन येण्यासाठी या झाडांना पुरक फुलोरा येणे गरजेचे आहे; परंतु यावेळी सोयाबीनच्या झाडांना पुरक फांद्या, शाखा वाढल्या नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. विदर्भात जवळपास १८ लाख हेक्टरच्यावर शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी केली; पण लगेच पावसाने दडी मारल्याने जवळपास ७0 टक्के पिकांना फटका बसला. शेकडो शेतकर्‍यांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागला. दुबार पेरणी केलेले पीक आले, पण या पिकांना फुलोरा येण्यासाठी एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यासाठी पुन्हा पावसाची गरज भासणार आहे. दरम्यान, यंदा पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने शेतकरी हतबल झाला असताना सोयाबीन पिकावर विविध किडींनी हल्ला केला आहे. हेलीकोर्व्हेपा या किडीने तर उच्छाद मांडला असून, नुकतीच अमरावती जिल्हय़ात नवी कीड कृषी अधिकार्‍यांच्या निदर्शनात आली आहे. अकोला व अमरावती जिल्हय़ातील काही भागातील सोयाबीन पिवळे पडले असून, पिवळा मोझ्ॉक या रोगामुळे या भागातील सोयाबीनची पाने पिवळी झाली आहेत. नत्राच्या कमतरतेमुळे पानातील हरितद्रव्ये कमी झाल्याने पाने पिवळी पडतात. अनेक ठिकाणी हिरवी उंट अळी निदर्शनास आली आहे. या अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास पिकाचे नुकसान होणार असल्याने शेतकर्‍यांना कीटकनाशकांचा खर्च करावा लागणार आहे.