शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

सोयाबीनला शेंगा लागल्याच नाही; शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:21 AM

खेट्री : पातूर तालुक्यातील उमरा येथे अल्पभूधारक शेतकऱ्याने पेरलेल्या सोयाबीनला शेंगा लागल्याच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शेतकरी आर्थिक ...

खेट्री : पातूर तालुक्यातील उमरा येथे अल्पभूधारक शेतकऱ्याने पेरलेल्या सोयाबीनला शेंगा लागल्याच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्याने बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला आहे.

उमरा येथील अल्पभूधारक शेतकरी विनोद मधुकर चिपडे यांची उमरा परिसरात शेत स. न.८८/४ अ दोन एकर असून, त्यामध्ये जून महिन्यामध्ये सोयाबीन पिकांची पेरणी केली होती. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डोंगरकिनी येथील एका कृषीसेवा केंद्रातून एका कंपनीची सोयाबीन बियाणे खरेदी करून जून महिन्यामध्ये पेरणी केली होती. पेरणी केल्यानंतर सोयाबीनचे बियाणे चांगले उगवले, मात्र त्याला शेंगाच लागल्या नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्याजाने पैसे घेऊन बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र, सोयाबीनला शेंगा लागल्याच नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यानेच सोयाबीनला शेंगा लागल्या नसल्याचा आरोप शेतकरी विनोद चिपडे यांनी कृषी विभाग, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे तक्रारीतून केला असून, भरपाईची मागणी केली आहे. कृषी विभागाने पंचनामा केला आहे.

३० हजार रुपयांचा खर्च गेला पाण्यात

अल्पभूधारक शेतकरी विनोद चिपडे यांनी दोन एकरांमध्ये सोयाबीन पिकांची पेरणी केल्यापासून, ३० हजार रुपयांचा खर्च लागला आहे. परंतु बियाणे निकृष्ट निघाल्याने सोयाबीनवर लावलेला ३० हजार रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.

शेतकऱ्याची तक्रार प्राप्त झाली असून, तक्रारीवर पंचनामा करण्यात आला आहे. पंचनाम्याचा अहवाल वरिष्ठांकडे सदर करण्यात आला आहे.

- एस. एस. पवार, कृषी सहय्यक, उमरा

-----------

सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याने सोयाबीनला शेंगा लागल्या नाही, ३० हजार रुपयांचा लावलेला खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे संबंधितांना दिलेल्या निवेदनातून बियांणे कंपनीविरुद्ध कारवाई करून नुकसानभरपाई द्यावी.

- विनोद मधुकर चिपडे, शेतकरी, उमरा

190921\0605img-20210918-wa0168.jpg

फोटो