शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पावसाळ्यातही विदर्भ, मराठवाड्यात टँकर कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 10:32 IST

Water Scarcity : विदर्भ, मराठवाड्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणारे टँकर कायम आहे.

अकोला : राज्यात मान्सूनचे आगमन होऊन १२ दिवस झाले आहे; परंतु पश्चिम महाराष्ट्र, कोकणचा भाग सोडता उर्वरित भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणारे टँकर कायम आहे. सद्य:स्थितीत राज्यात ३५४ टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाणीटंचाईमध्ये चांगलीच वाढ झाली होती. ती कमी करण्यासाठी शासनाने लोकसहभाग आणि कृषी विभागांतर्गत विविध जलसंधारणाची कामे हाती घेऊन पूर्ण केली. राज्यात गेल्यावर्षी पावसाळ्यात चार ते पाच महिने चांगला पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. परिणामी, चालू वर्षी पाणीटंचाईच्या झळा कमी प्रमाणात जाणवल्या. १४ जूनपर्यंत प्राप्त माहितीत सद्य:स्थितीत राज्यात ३५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. पावसाचे आगमन झाल्याने राज्यात टँकरची संख्या घटली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागात टँकरची संख्या निम्म्यावर आली; परंतु विदर्भ व मराठवाड्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने येथे टँकरची संख्या कायम आहे. विदर्भात ११३ तर मराठवाड्यात ८१ टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे. या भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

टँकरव्दारे पाणीपुरवठा

विदर्भ ११३

मराठवाडा ८१

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात टँकर घटले!

राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी टँकरची संख्या घटली आहे. १४ जूनपर्यंत प्राप्त अहवालात कोकण ५१, नाशिक ७५, पुणे विभागात ३४ टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे.

 

मागील वर्षीपेक्षा यंदा टँकर कमी

गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे यंदा राज्यात टँकरची संख्या कमी आहे. मागील वर्षी याच वेळेला ७९९ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई