शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

जिल्ह्याला बारदान्याच्या १२० गाठी प्राप्त! शेतकऱ्यांना दिलासा

By रवी दामोदर | Published: April 17, 2023 4:34 PM

दहाही केंद्रावर पुन्हा खरेदी सुरळीत

रवी दामोदर, अकोला: केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीमध्ये नाफेडद्वारा हरभरा खरेदीला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांचा प्रतिसादही मिळत आहे. दरम्यान, गत दि. १३ एप्रिलपासून बारदान्याअभावी खरेदी रखडली होती. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्तसुद्धा प्रकाशित करीत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. रविवार, दि. १६ एप्रिल रोजी जिल्ह्याला बारदान्याच्या १२० गाठी प्राप्त झाल्याने खरेदी पुन्हा पूर्ववत सुरू झाली असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

खासगी बाजारात भाव कमी असल्याने प्रतीक्षा असलेली हरभऱ्याची शासकीय खरेदी दि. १४ मार्चपासून सुरू झाली आहे. शासनाने यंदा ५,३३५ रुपये हमीभाव जाहीर केलेला असताना ४,३०० ते ४,६०० रूपये क्विंटलदरम्यान बाजार समित्यांमध्ये भाव मिळत आहे. हरभऱ्याला खुल्या बाजारपेठेत अद्याप हमीभाव इतका दर मिळालेला नाही. त्यामुळे हरभऱ्याच्या शासकीय खरेदीला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. शेतकऱ्यांकडून नाफेडद्वारा शेतमाल खरेदी सुरू होती; मात्र दि. १३ एप्रिलपासून बारदान्याअभावी खरेदी रखडली होती. ऐन खरीप हंगामाची तयारी तोंडावर असताना नाफेडद्वारा खरेदी थांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. खरेदी पूर्ववत होण्यासाठी जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडून पत्रव्यवहार करण्यात आले होते. रविवारी जिल्ह्याला १२० गाठी प्राप्त झाल्या असून, दहाही केंद्रावर खरेदी पूर्ववत सुरू झाली आहे. जिल्ह्यात तब्बल १८ हजारांवर शेतकऱ्यांनी नाफेडकडे ऑनलाइन नोंदणी केली आहे.

१ गाठीत असतात ५०० कट्टे

जिल्ह्यात नाफेड केंद्रावर बारदान्याअभावी खरेदी थांबली होती. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बारदाना कलकत्ता येथून निघाल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, बारदान्याच्या गाठी घेऊन दोन ट्रक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे रविवारपासूनच खरेदी केंद्रावर खरेदी सुरळीत करण्यात आली आहे. एका गाठीमध्ये ५०० कट्टे असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार, जिल्ह्याला तब्बल ६० हजार कट्टे प्राप्त झाले आहेत.

टॅग्स :Akolaअकोला