शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
2
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
3
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
4
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
5
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
6
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
7
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
8
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
9
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
10
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
11
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
12
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
13
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
14
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
15
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."
16
आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?
17
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
18
Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम
19
India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
20
आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

...तर लुटारूंच्या फौजा उभ्या राहतील!

By admin | Published: June 24, 2016 12:45 AM

जिल्हा परिषदेतील मोफत बियाणे वाटप कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन.

अकोला: सरकार व्यापार्‍यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचा आरोप करीत, शेतकर्‍यांच्या शेतमालास बाजारमूल्य मिळाले नाही, तर लुटारूंच्या फौजा उभ्या राहतील, असे प्रतिपादन भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी येथे केले. जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित शेतकर्‍यांना मोफत कपाशी बियाणे वाटप कार्यक्रमात अँड. आंबेडकर बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार बळीराम सिरस्कार, भारिप-बमसंचे जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, सभापती रामदास मालवे, गोदावरी जाधव, द्रौपदा वाहोकार, गटनेता विजय लव्हाळे, सदस्य गोपाल कोल्हे, जमीरउल्ला पठाण, संध्या वाघोडे, रेखा अंभोरे, शबीना खातून सैफुल्लाखाँ, ज्ञानेश्‍वर सुलताने, बळीराम चिकटे उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकारने काहीच केले नसून, शेतकर्‍यांच्या दृष्टीने राज्य सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप अँड. आंबेडकर यांनी केला. व्यापारासाठी मार्केट उभारण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला; मात्र शेतकर्‍यांच्या शेतमालास बाजारमूल्य उपलब्ध करून देण्यासाठी कोणतेही धोरण ठरविण्यात येत नसल्याचे सांगत, शेतकर्‍यांच्या शेतमालास बाजारमूल्य न मिळाल्यास लुटारूंच्या फौजा तयार होतील, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हा परिषद सेस फंडातून अल्पभूधारक शेतकर्‍यांना मोफत बियाणे वाटपाची योजना राबविण्यात येत असून, या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनेत पुढील वर्षी बियाण्यासोबतच खतवाटपाचा समावेश करण्याचा सुतोवाच त्यांनी केला. लागवडीचा खर्च कमी कसा होईल, याच दिशेने यापुढे जिल्हा परिषद वाटचाल करणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. अनेक अडथळे पार करून, जिल्हा परिषदमार्फत मोफत बियाणे वाटपाची योजना मार्गी लागली असून, समन्वय आणि सहकार्याची भूमिका घेऊन योजना राबविण्यात आल्या पाहिजे, असे विचार आ. बळीराम सिरस्कार यांनी यावेळी मांडले.