शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

बायोमेट्रिकशिवाय आता नवे बँक खाते नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 12:09 IST

देशभरातील नवीन खातेदारांना बँक खाते उघडण्यासाठी बायोमेट्रिकच्या आॅनलाइन प्रक्रियेतून जावे लागत आहे.

ठळक मुद्देबँक खाते उघडण्यासाठी पूर्वी रेशनकार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड आदी माहिती जोडावी लागत होती.आता केवळ दस्तऐवजावर बँक खाते उघडता येत नाही. बँक खाते उघडताना ती व्यक्ती प्रत्यक्षात घटनास्थळावर असणे गरजेचे आहे. बायोमेट्रिक फिंगरप्रिंटद्वारे आधार लिंक जुळून आली पाहिजे. जर तसे झाले नाही तर बँक खाते उघडणे अशक्य आहे.

- संजय खांडेकर

अकोला : आधार लिंक आवश्यक नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार बायोमेट्रिक आधारशिवाय बँक खाते उघडणे अशक्य आहे, देशभरातील नवीन खातेदारांना बँक खाते उघडण्यासाठी बायोमेट्रिकच्या आॅनलाइन प्रक्रियेतून जावे लागत आहे. यासंदर्भात अद्याप तरी कोणतेही नवे निर्देश नाहीत.बँक खाते उघडण्यासाठी पूर्वी रेशनकार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड आदी माहिती जोडावी लागत होती. या दस्तऐवजासह फोटो दिले की बँकेचे खाते उघडल्या जात असत; मात्र आता केवळ दस्तऐवजावर बँक खाते उघडता येत नाही. बँक खाते उघडताना ती व्यक्ती प्रत्यक्षात घटनास्थळावर असणे गरजेचे आहे. तर त्या व्यक्तीची बायोमेट्रिक फिंगरप्रिंटद्वारे आधार लिंक जुळून आली पाहिजे. जर तसे झाले नाही तर बँक खाते उघडणे अशक्य आहे. त्यामुळे देशभरातील बँकांमधील नवीन खाते आता विना बायोमेट्रिकशिवाय अस्तित्वातच येणार नाही, अशी यंत्रणा करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पाहता ही बाब चांगली आहे; मात्र अद्ययावत तंत्रज्ञानाच्या विश्वात त्याचे वाईट परिणामही भविष्यात समोर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.व्यक्तिगत माहिती पडताळणीसाठी आॅनलाइन बायोमेट्रिक यंत्रणा गरजेची आहे. जुन्या बँक खात्यांसाठी ई-केवायसी आणि नवीन बँक खात्यांसाठी बायोमेट्रिक नोंद अत्यावश्यक आहे. त्याशिवाय नवीन खाते उघडले जाऊच शकत नाही. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे तसे निर्देश आहेत.- आलोक तेहेनीजा, लिड बँक मॅनेजर,अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाbankबँकtechnologyतंत्रज्ञान