शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
2
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
3
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
4
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
5
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
6
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
7
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
8
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
9
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
10
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
11
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खंत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
13
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
14
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
15
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
16
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
17
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
18
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
19
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
20
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

चरणगावात तीन गटांनी घेतली गावविकासाची शपथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:34 AM

पातूर : ग्रा. पं. निवडणुकीत पदांसाठी रस्सीखेच करताना तयार झालेले गट निवडणुकीनंतरही पाच वर्षे एकमेकांविरुद्ध लढत असतात, मात्र जनतेचा ...

पातूर : ग्रा. पं. निवडणुकीत पदांसाठी रस्सीखेच करताना तयार झालेले गट निवडणुकीनंतरही पाच वर्षे एकमेकांविरुद्ध लढत असतात, मात्र जनतेचा कौल स्वीकारून चरणगावचे तीनही गटांनी एकत्र येत गावविकासाठी नवा आदर्श घालून दिला आहे. उपसरपंच वैशाली दीपक इंगळे यांच्या पदभाराच्या दिवशी तिन्ही गटांनी एकत्रित येत गाव विकासाची शपथ घेतली.

पातूर तालुक्यात २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि त्यानंतर सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी मित्र, काका-पुतणे, भाऊ- चुलत भाऊ तथा नात्यागोत्यातील अनेक सहकारी एकमेकांविरुद्ध उभे राहिले. कुठे कोणाचा पराभव झाला तर कुठे कुणाला यश प्राप्त झालं, असे असले तरी पातूर तालुक्यातील मात्र चरणगावच्या ग्रामपंचायतमध्ये गावकऱ्यांनी तीन गटांना कौल दिला. यात प्रामुख्याने जि. प. सदस्य विनोद देशमुख, माजी सभापती प्रमोद ऊर्फ पप्पू देशमुख आणि मुरलीधर क्षीरसागर, संताेष इंगळे, बाळकृष्ण वसतकार यांच्या नेतृत्वात लढलेल्या पॅनलची निवडणुकीत त्रिशंकू स्थिती चरणगाव येथे निर्माण झाली होती. सरपंच पदाची निवडणूक ही एकमेकाविरुद्ध लढली.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकासासाठी एकत्रित येणारे गाव म्हणून चरणगावची विशेष ओळख आहे, हीच ओळख कायम ठेवण्यासाठी उपसरपंच पदाचा पदभार घेण्यासाठी वैशाली दीपक इंगळे यांनी पुढाकार घेतला. मुरलीधर क्षीरसागर, धनंजय देशमुख, सुमित्रा बाळकृष्ण वसतकार, पूजा धनंजय गाडेकर, मेघा प्रमोद देशमुख, अरुणा गजानन देशमुख, उत्तम विठ्ठल इंगळे, राजेश देविदास शिरसागर यांनी उपसरपंच वैशाली इंगळे यांना विकासासाठी बळ दिले. पदभाराचा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख, माजी सभापती पप्पू देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बाळकृष्ण वसतकार, संतोष शंकर इंगळे, दीपक इंगळे, प्रज्योत इंगळे, विलास इंगळे, सुनील इंगळे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर पोरे, परसराम सुलताने, भास्कर सुलताने, विनोद नानाराव देशमुख, निलेश रामकृष्ण देशमुख, शैलेश देशमुख, राजेश देशमुख, निलेश विश्वनाथ इंगळे, राजेंद्र इंगळे, रेखाताई शिरसागर, भाविका रमेश शिंदे, अक्षय शिरसाट, ग्रामसेवक अशोक देवकते, तलाठी सुरेश घाटे यांची उपस्थिती हाेती. सूत्रसंचालन श्रीकृष्ण इंगळे यांनी केले.

.....................

गावकऱ्यांना केले आवाहन

राजकीय मतभेद विसरून पुढील निवडणुका येईपर्यंत गाव विकासासाठी एकत्रित यावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख, माजी सभापती पप्पू देशमुख व मुरलीधर शिरसागर या तीनही गटाच्या प्रमुखांनी गावकऱ्यांना केले.