शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

तीन वर्षात ६० टक्केच घरकुलांची कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 2:34 PM

गेल्या तीन वर्षात मंजूर घरकुलांपैकी केवळ ६० टक्के पूर्ण झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : सर्वांना घरे, या संकल्पनेतून केंद्र शासनाने २०२२ पर्यंत देशभरातील बेघरांना घरकुल देण्याची तयारी केली. त्यासाठी प्रतीक्षा यादीतील लाभार्थी, दिलेला लक्ष्यांक, मंजूर संख्या तसेच कामाची गती पाहता ठरलेल्या कालावधीत सर्वांनाच घरे मिळणे आता अशक्य दिसत आहे. गेल्या तीन वर्षात मंजूर घरकुलांपैकी केवळ ६० टक्के पूर्ण झाली आहेत. ४० टक्के घरकुले अपूर्ण असून, त्यापुढील लाभार्थींसाठीचा लक्ष्यांकही अद्याप प्राप्त झालेला नाही. केंद्र शासनाची प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, राज्याची रमाई आवास, शबरी, पारधी आवास योजनांतून विविध समाजघटकांतील लाभार्थींची निवड घरकुलासाठी केली जाते. गेल्या तीन वर्षात या सर्व योजनांसाठी लाभार्थींचा लक्ष्यांक देण्यात आला. त्यापैकी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून घरकुलांना मंजुरी देण्यात आली. तर प्रत्यक्षात सुरू झालेल्या घरकुलांपैकी ६० टक्केच पूर्ण झाली. त्यामध्ये बाळापूर तालुक्यातील घरकुलांची कामे होण्याची टक्केवारी सर्वात कमी आहे. ती ५३.६० आहे. तर मूर्तिजापूर तालुक्यातील घरकुले ७० टक्के पूर्ण झाली आहेत. 

गेल्या काही महिन्यांपासून घरकुलांच्या देयकांची रक्कम मिळत नसल्याने ती कामे रखडली आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात लाभार्थींना समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे, घरकुलांना हप्त्यांची रक्कम मिळण्यासाठी किमान ७२ कोटी रुपयांची जिल्ह्यात गरज आहे. हा निधी आता केव्हा मिळणार, त्यावरच घरकुलांची कामे पूर्ण होणे अवलंबून आहे. 

दरम्यान, घरकुलांचा प्राप्त लक्ष्यांक पाहता ती सर्व घरकुले मंजूर करण्याचा सपाटा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी लावला होता. त्यांच्या बदलीनंतर घरकुल मंजुरीच्या प्रक्रियेतही कमालीची शिथिलता आल्याने अनेक घरकुले मंजूरच झालेली नाहीत. त्यामुळेही सर्वांना घरे या संकल्पनेला प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी काही वर्ष लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना