शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मानवी विष्ठेची मजुरांकडून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 11:13 IST

विष्ठा नदीच्या काठावरच टोपल्यांनी टाकल्यामुळे दुर्गंधी व प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : बाळापूर नगरपालिकेकडे मलनिस्सारण यंत्र नसल्याने शौचालयांचे टाके खाली करण्यासाठी मजुरांकडून मानवी विष्ठा डोक्यावरून वाहून न्यावी लागत आहे. ही विष्ठा नदीच्या काठावरच टोपल्यांनी टाकल्यामुळे दुर्गंधी व प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.बाळापूर नगर परिषदेने २00२ मध्ये ट्रॅक्टर सोबतच व्हॅक्युम एमटीआर मलनिस्सारण यंत्र आणले; परंतु त्याचा एकदाही उपयोग न झाल्याने लाखो रुपयांचे महत्त्वाचे उपकरण वापरात नाही. त्यामुळे, शहरातील शौचालयांचे टाके उपसण्यासाठी मजुरांना जुंपून टोपल्याद्वारे मानवी विष्ठेची वाहतूक करावी लागत आहे. ही विष्ठा नदी काठावर फेकण्यात येत असल्याने परिसर व नदीचे प्रदूषण होत आहे. शासन एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करून परिसर स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करते; मात्र नगर परिषद प्रशासन शहरातील सर्व घनकचरा नदीकाठावरच टाकत असल्याचे चित्र आहे. या कचऱ्यावरच मानवी विष्ठा फेकण्यात येत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे.शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनुदान देऊन घरोघरी शौचालयांची निर्मिती केली आहे. सेफ्टिक शौचालयांचे टाके लवकरच भरत आहेत. हे टाके खाली करण्यासाठी नगर परिषदेकडे हॅक्युम एमटीआर मलनिस्सारण यंत्र नसल्याने मजुरांच्या माध्यमातून ते खाली करण्यात येतात. हे टाके खाली करण्यासाठी मजूर हातगाडी किंवा जवळ असल्यास डोक्यावर टोपल्यात भरून त्याची वाहतूक करीत आहेत. ही विष्ठा नदीच्या काठावरच टाकण्यात येत असल्याने परिसरात प्रदूषणात वाढ झाली आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  ५५ हजार लोकसंख्येच्या शहरात व्हॅॅक्युम एमटीआर यंत्र नसल्याने नदी काठावर मानवी विष्ठा टाकण्याचे काम माणसाकडून करून घेणे हा गुन्हा आहे. शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन प्रदूषण करीत असलेल्या नगरपालिकेवर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच मानवी विष्ठा डोक्यावरून वाहून नेणे चुकीचे आहे. यावर कडक कारवाई व्हावी.- रमेश लोहकरे,जिल्हा भाजपा सचिव,बाळापूर

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर परिषदेचे व्हॅक्युम एमटीआर यंत्र नादुरुस्त आहे. त्याचा वापर नसल्याने खराब झाले. शहरातील टाके साफ करण्यासाठी बाहेरून ट्रॅक्टरचे व्हॅक्युम एमटीआर बोलविण्यासाठी नागरिकांना सूचना केल्या. नवीन व्हॅक्युम एमटीआर यंत्र बोलविण्यासाठी सभागृहात चर्चा करून नवीन यंत्र घेण्याची तरतूद करू. नागरिकांनी टाके साफ करण्यासाठी मानवाऐवजी यंत्राचा वापर करावा.- जी.एस. पवार,न.प. मुख्याधिकारी, बाळापूर

टॅग्स :BalapurबाळापूरAkolaअकोला