शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
3
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
4
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
5
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
6
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
7
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
8
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
10
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
11
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
13
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
14
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
15
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
16
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
17
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
18
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
19
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
20
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं

ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवडीचा बोजवारा; उद्दिष्ट ५.३५ लाख, लागवड केवळ ५१ हजार!

By संतोष येलकर | Published: October 10, 2023 5:52 PM

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पावसाळ्यात ग्रामपंचायती आणि विविध यंत्रणांमार्फत वृक्षलागवड करण्यात येते.

अकोला : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षलागवड कार्यक्रमात यंदा जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या स्तरावर ५ लाख ३५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असताना, सप्टेंबर अखेरपर्यत केवळ ५१ हजार ६०० वृक्षलागवड करण्यात आली. सातपैकी तीनच तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या वृक्षलागवडीचा बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर आले आहे. 

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पावसाळ्यात ग्रामपंचायती आणि विविध यंत्रणांमार्फत वृक्षलागवड करण्यात येते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या स्तरावर प्रत्येकी एक हजार याप्रमाणे ५ लाख ३५ हजार वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदमार्फत निश्चित करण्यात आले होते. 

वृक्षलागवड करण्याची मुदत गेल्या सप्टेंबर अखेर संपुष्टात आली असून, त्यामध्ये उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी तीनच तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या स्तरावर केवळ ५१ हजार ६०० वृक्षलागवड करण्यात आली आहे. उर्वरित चार तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड केली नसल्याने यंदा जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या स्तरावरील वृक्षलागवडीचा बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर आले आहे.

तीन तालुक्यांत ग्रामपंचायतींच्या वृक्षलागवडीचे असे आहे वास्तव

तालुका             वृक्षलागवडअकोला             १७,०००पातूर                 २७,०००बार्शीटाकळी       ७६००

५३५ ग्रामपंचायतींपैकी केवळ २३ ग्रामपंचायतींनी केली लागवड !प्रत्येक ग्रामपंचायतीने एक हजार याप्रमाणे जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींनी ५ लाख ३५ हजार वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. परंतु, त्यापैकी केवळ २३ ग्रामपंचायतींनी ५१ हजार ६०० वृक्षलागवड केली आहे. अकोला तालुक्यात १०, पातूर तालुक्यात ९ आणि बार्शीटाकळी तालुक्यात ४ अशा एकूण २३ ग्रामपंचायतींच्या स्तरावर वृक्षलागवड करण्यात आल्याचे चित्र आहे.

चार तालुक्यांत ग्रामपंचायतींनी केली नाही वृक्षलागवड !जिल्ह्यातील अकोला, पातूर व बार्शीटाकळी या तीन तालुक्यांतील ग्रामपंचायतींकडून ५१ हजार ६०० वृक्षलागवड करण्यात आली. परंतु जिल्ह्यातील बाळापूर, अकोट, तेल्हारा व मूर्तिजापूर या चार तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून वृक्षलागवड करण्यात आली नसल्याचे चित्र आहे.

२६ लाख रुपयांचा खर्च !जुलै ते सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या स्तरावर वृक्षलागवड करण्यात आली. त्यामध्ये सातपैकी तीनच तालुक्यांत केवळ ५१ हजार वृक्षलागवड करण्यात आली असून, लागवड आणि संगोपनाच्या कामावर २५ लाख ९७ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. 

टॅग्स :Akolaअकोला