शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी प्रयत्न करा! - केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 18:38 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबल्या नाहीत. त्यावर अद्याप कोणताही तोडगा काढता आला नाही, अशी खंत व्यक्त करताना यामागील सूक्ष्म कारण शोधून उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शनिवारी अकोला येथे केले.

अकोला: जे काही बदल होत असतात, ते स्वीकारणे कठीण जात असतात, त्याला मानवी अहंकार आडवा येतो. म्हणूनच कुणाला जाणवू न देता असे काही बदल करावे लागतात. जलसंधारण आणि सिंचनाच्या बाबतीतही काही चांगले बदल करण्यात येत आहेत. ते बदल स्वीकारले पाहिजे. शेतकरी त्यादृष्टीने प्रयत्न करतोय; परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबल्या नाहीत. त्यावर अद्याप कोणताही तोडगा काढता आला नाही, अशी खंत व्यक्त करताना यामागील सूक्ष्म कारण शोधून उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शनिवारी अकोला येथे केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सिंचन सहयोग, अकोलाच्यावतीने डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात आयोजित दोन दिवसीय २० व्या राज्यस्तरीय महाराष्टÑ सिंचन परिषदेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. मंचावर आंतरराष्टÑीय जलसिंचन व जलनिस्सारण आयोगाचे माजी सहकार्यवाह डॉ. माधवराव चितळे, महाराष्टÑ सिंचन सहयोग अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे औरंगाबाद, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, तापी खोरे विकास महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक संजय कुळकर्णी जळगाव, पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र जलतारे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अधीक्षक अभियंता संजयकुमार अवस्थी, डॉ. बापू अडकिने, कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, संचालक शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर,अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. एम.बी. नागदेवे यांची उपस्थिती होती.धोेत्रे पुढे म्हणाले, रासायनिक खते, कीटकनाशकांनी शेतीची पोत बदलली असून, यामुळे पाण्याचे जमिनीत जलसंधारण होत नाही. म्हणूनच आता जमिनीची सुपीकता वाढविण्यावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. नलिका वितरण प्रणालीवर बोलताना ते म्हणाले, तात्पुरता फायदा बघण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजनांकडे बघणे गरजेचे आहे. कालव्याने पाणी सोडले तर शेतकºयांच्या विहिरीतील पातळी वाढते; परंतु पाइपने पाणी सोडले तर शेतकºयांच्या विहिरींना पाणी कसे येणार, असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित होत आहे. म्हणूनच कोणतेही व्यवस्थापन करा; पण ते परिपूर्ण, योग्य असावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे