शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

तुळशीचं अंगण हरवलं!

By admin | Published: November 25, 2015 2:16 AM

अंगणामध्ये अगदी मानाचं स्थान असलेली तुळसाबाई आज जनमानसातून लुप्त होत आहे.

नितीन गव्हाळे /अकोला : भारतीय संस्कृतीमध्येच काय, आयुर्वेदामध्येसुद्धा तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 'तुलसी श्रीसखी शुभे पापहारिणी पुण्य दे' असे म्हटले जाते ते उगाच नाही. पूर्वी प्रत्येकाच्या घरासमोर सुंदरसं तुळशी वृंदावन असायचं. सकाळच्या प्रहरी तुळशीची पूजा होऊन घरात एकप्रकारचे धार्मिक वातावरण तयार व्हायचे; परंतु सध्याच्या काळात हे सर्व हरवत चाललं आहे. अंगणामध्ये अगदी मानाचं स्थान असलेली तुळसाबाई आज जनमानसातून लुप्त होत आहे. खरं म्हणजे, तुळशीचं हक्काचं अंगणच हरवलं आहे. लोकसंख्येच्या स्फोटात स्वतंत्र घरांचे अस्तित्व, घराची शोभा वाढविणारे तुळशी वृंदावन आणि एकूणच घरपण नष्ट होत चालले आहे. एकेकाळी हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी वृंदावनाला महत्त्व होते. वृंदावन नसलेले घर क्वचितच बघायला मिळे. तुळशी वृंदावन अंगणात असण्यामागे धार्मिक किंवा आयुर्वेदिक आधार होता. 'तुळशी वृंदावन जयाचे द्वारी।। धन्य तो प्राणी संसारी। तयाच्या पुण्या नाही सरी।। नित्य तो तुलसीस नमस्कारी।। त्यासी देखोनि यम पळे दुरी।। विष्णुदूत आदर करी।।' असे 'तुळशी माहात्म्य'मध्ये म्हटले आहे. साधारणत: १५-२0 वर्षांपूर्वीचा विचार केला, तर अंगणातील तुळशी वृंदावनासमोर महिला भगिनी दररोज तुळशीला पाणी घालत, प्रदक्षिणा घालून पूजा करीत असत. सायंकाळी दिवा लावला जायचा. अलीकडच्या काळात फ्लॅट संस्कृतीचा शिरकाव झाला. वाढत्या लोकसंख्येसाठी तरतूद म्हणून अपार्टमेंटसारख्या गगनचुंबी इमारती उभ्या राहू लागल्या. फ्लॅट संस्कृतीमध्ये दारासमोर अंगणच नसल्याने तुळशी वृंदावनाची संकल्पना बाजूला पडली. जुन्या काळी लोक घर बांधताना तुळशी वृंदावन आवर्जून उभारीत असत. अलीकडे तुळशीचे अंगणच हिरावून घेतले आहे. तुळशी वृंदावन संस्कृतीच आम्ही मोडीत काढली आहे.

*वृंदावन हरवलं अन् संस्कारही!

तुळशीचं वृंदावन तर हरवलंच, परंतु त्यासोबत लहान मुलांवरील संस्कारसुद्धा हरविले. घरातील आई, वडीलधारी माणसं सायंकाळी लहान मुलांना घेऊन तुळशीसमोर 'दिवा लागला तुळशीपाशी..', 'दिव्या दिव्या दीपत्कार..' यांसह धार्मिक श्लोक म्हणायला लावीत. अलीकडे हे सर्व नाहिसं झालं. वृंदावनासोबतच आमचे संस्कारसुद्धा हरवत चालले आहेत.

*आयुर्वेदामध्ये तुळशीचे माहात्म्य

वेद, पुराण, आयुर्वेदामध्ये तुळशीचे माहात्म्य सांगितले आहे. श्री विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशी पानांनी विष्णूचे पूजन केले, तर व्रत, यज्ञ, जाप केल्याचे फळ लाभते. कृष्णपत्नी रुक्मिणीचा अवतार तुळस आहे, असे मानले जाते. म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशी विवाह लावला जातो आणि या दिवसापासून विवाह मुहूर्त प्रारंभ होतात.