शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
3
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
4
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
5
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
6
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
7
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
8
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
9
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
10
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
11
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
12
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
13
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
14
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
15
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
16
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
17
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
18
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
19
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
20
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी

दोन वर्षात कोट्यावधीचा धान्यसाठा जप्त

By admin | Published: April 04, 2015 2:00 AM

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या गत दोन वर्षांत १३00 कारवाया; १ हजार ९८५ लोकांवर गुन्हा दाखल.

बुलडाणा : समाजातील प्रत्येकस्तरातील घटकास अन्नधान्य मिळावे, या उद्देशाने शासनाकडून गोर गरिबांना स्वस्त दरात धान्य वाटप केले जाते; मात्र या अन्नधान्याची साठेबाजी व काळाबाजार मोठय़ा प्रमाणात होतो. यावर अंकुश लावण्यासाठी राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने गत दोन वर्षात राज्यभरात जवळपास १३00 कारवाया केल्या. या कारवायांमध्ये कोट्यवधीचा धान्यसाठा जप्त करुन १ हजार ९८५ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. काही स्वस्त धान्य दुकानदार महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धान्याची उचल करतात व योग्य पुरवठा करीत नाही, स्वत:च्या मर्जीने लाभार्थी निवडतात, मयत व परगावी असणार्‍या लोकांची बोगस नावे घालतात, शिवाय अन्नधान्याची साठेबाजी केली जाते. या गैरव्यवहाराबाबत प्राप्त ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत अन्न व नागरी पुरवठा विभागाने अवैध धान्यसाठा करणार्‍यांविरुद्ध विविध जिल्ह्यात धाडसत्र राबविले. अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये साठेबाजी व काळाबाजार करणार्‍यावर २0१३ आणि २0१४ या दोन वर्षात १ हजार ३७८ धाडी घालण्यात आल्या. या कारवाईत गुन्हे नोंद करुन १ हजार ९८५ लोकांना अटक करण्यात आली. १ हजार ३२९ लोकांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले.

*पेट्रोल व गॅस सिलेंडरचा काळाबाजार

      मागील काही वर्षांपासून रॉकेल, पेट्रोल आणि गॅस सिलींडरचा काळाबाजार करणार्‍यांवर राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने कारवाई केली. यात ३८ लाख रुपये किंमतीचे पेट्रोल, ७३ लाख रुपयांचे डिझेल, २ कोटी ४९ लाख रुपयांचे १६ हजार गॅस सिलींडर जप्त करण्यात आले.