शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

अवकाळीची अवकृपा; ५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By रवी दामोदर | Updated: April 8, 2023 16:32 IST

शेतकरी हतबल, मदतीची प्रतीक्षा

अकोला : जिल्ह्यात शुक्रवारी सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे व झालेल्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले नगदी पीक जमीनदोस्त झाल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आधीच शेतमालाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यातच पुन्हा नैसर्गिक संकटाने तर बळीराजा आर्थिक खाईत लोटला गेला आहे. नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ५ हजार २४२ हेक्टर क्षेत्रावरील गहू, कांदा, टरबुज, पपई, भाजीपाला व लिंबू या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच १६ जनावरे दगावली असून, ४६ घरांचेही नुकसान झाले आहे. २० दिवसांमध्ये तिसऱ्यांचा गारपीटीसह पाऊस झाल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

प्रादेशीक हवामान विभागाकडून जिल्ह्यात शनिवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसारा, शुक्रवारी सकाळी उन्हाचा पारा चढत असताना अचानक काळे ढग दाटून येत वादळवाऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर अवकाळीच्या पावसाला जोरदार सुरुवात होऊन काही भागात गारपीटही झाली. या अवकाळीचा सार्वाधिक फटका पातूर तालुक्याला बसला असून, ३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके बाधित झाले. तसेच अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर तालुक्यातही अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्ताकडे सादर करण्यात आला असून, पंचनामे व सर्व्हेक्षणाची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

वीज पडून एकाचा मृत्यू, १६ जनावरे दगावली, ४६ घरांचे नुकसानजिल्ह्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला तालुक्यातील लोणाग्रा शिवारात अंगावर वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील १६ जनावरे दगावली आहेत. तसेच ४६ घरांचेही नुकसान झाले आहेत. त्यात ४५ घरांचे अंशत: तर १ घर जमिनदोस्त झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी