शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

Vidhan Sabha 2019 : विदर्भ जिंकण्याचे वासनिकांपुढे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 13:41 IST

काँग्रेसपुढील आव्हानांचा सामना करीत विजय मिळवून देण्यासाठी आता वासनिकांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

- राजेश शेगोकार अकोला: एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या विदर्भात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ६२ पैकी ४४ जागांवर भाजपचे ‘कमळ’ फुलले तर अवघ्या १० जागांवर काँग्रेसला विजय मिळविता आला. या पृष्ठभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसपुढे आव्हानांचा डोंगर आहे. काँग्रेसने प्रथमच निवडणुकीसाठी विभागवार प्रभारींची निवड केली असून, विदर्भाची जबाबदारी ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्यावर देण्यात आली आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी ते सर्वात प्रबळ दावेदार होते. त्यामुळे काँग्रेसपुढील आव्हानांचा सामना करीत विजय मिळवून देण्यासाठी आता वासनिकांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.अ.भा. काँगे्रसचे ज्येष्ठ सरचिटणीस असलेल्या वासनिकांचा प्रवास बुलडाण्याचे खासदार ते दिल्लीच्या वर्तुळातील बडे प्रस्थ असा आहे. इंदिरा गांधीजींच्या नेतृत्वाचा अनुभव, राजीव गांधी, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासोबत प्रत्यक्ष काम मध्य प्रदेश, राज्यस्थान, बिहार व केरळ अशा अनेक प्रदेशांचे प्रभारी राहिलेल्या वासनिकांकडे सध्या लक्षद्वीप, पाँडेचरी, अंदमान व केरळ या राज्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या या प्रभावी कारकिर्दीमुळेच त्यांचे नाव काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी सर्वाधिक चर्चेत होते. अखेरच्या क्षणी सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी दर्शविल्यावर वासनिकांचे नाव मागे पडले. या पृष्ठभूमीवर वासनिकांना देण्यात आलेली विदर्भाची जबाबदारी त्यांच्या संघटन कौशल्याची परीक्षा ठरणार आहे.  पूर्व व पश्चिम या दोन्ही विभागांतून संसदेमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या वासनिकांना उमेदवार निवडीपासूनच कसोटीला सामोरे जावे लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची केलेली उलथापालथ लक्षात घेता, या पक्षाच्या उंबरठ्यावर अनेक नेते आहेत. काँग्रेसने उमेदवारी नाकारली तर ‘वंचित’सोबत घरोबा करण्याची तयारी काहींनी करून ठेवली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी होणाºया गटबाजीची लॉबिंग हाणून पाडत मेरिटवर उमेदवारी देण्यात वासनिक यशस्वी ठरले तर लढाईमधील पहिला टप्पा ते जिंकतील, अशी स्थिती आहे. काँग्रेसमध्ये त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. पश्चिम विदर्भात तर त्यांचा शब्द हा काँग्रेसमध्ये प्रमाण आहे. त्यामुळे या भागात जिंकलेल्या पाच जागा कायम ठेवत विजयाचा आकडा वाढविण्यासाठी त्यांना गटबाजी संपवावी लागणार आहे.  यवतमाळ व नागपुरातील गटबाजी सर्वश्रुत आहे. बुलडाण्यात चिखलीचे आमदार हे पक्षांतराच्या वाटेवर असल्याची चर्चा शमता शमत नाही. अकोला जिल्हा हा काँग्रेसमुक्त जिल्हा झाला आहे. दोन दशकांपासून काँग्रेसला हा हक्काचा आमदार मिळालेला नाही. मित्रपक्ष असलेल्या राष्टÑवादीमध्ये अनेक नेते हे वासनिकविरोधी आहेत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा सर्वाधिक प्रभाव विदर्भात आहे. एक लोकसभा मतदारसंघ सोडला तर सर्व जागांवर भाजपा, शिवसेनेचा विजय झालेला आहे. त्यामुळे या सर्व आव्हानांचा सामना करीत मित्रपक्षांशी समन्वय ठेवून काँगे्रसला एकसंधपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात वासनिकांना कितपत यश येते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष राहणार आहे.

टॅग्स :Mukul Wasnikमुकूल वासनिकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसVidarbhaविदर्भAkolaअकोला