शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

अकोला जिल्ह्यातील ५१० गावांत ग्रामस्थांना मिळत नाही ५५ लीटर पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 10:49 IST

Akola News ५१० गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सात प्रादेशिक, ४९६ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणी पुरवठा.ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ४० लीटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी मिळत आहे.

अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात सात प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि ४९६ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत जिल्ह्यातील २०६ गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी, जिल्ह्यातील ५१० गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.

शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबास २०२४ पर्यंत नळजोडणीव्दारे दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यात सद्यस्थितीत सात प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत व ग्रामपंचायतींच्या ४९६ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत २०६ गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी पुरवठा करण्यात येत असून, जिल्ह्यातील ५१० गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ४० लीटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी मिळत आहे.

किती दिवसाआड मिळते पाणी

अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ३ दिवसाआड.

अकोला तालुक्यातील खांबोरा ६० खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत १० ते १२ दिवसाआड.

खांबोरा ४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३ दिवसाआड.

बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर १० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत २ दिवसाआड.

बाळापूर तालुक्यातील लोहारा २ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत दररोज.

बाळापूर तालुक्यातील वझेगाव २ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत दररोज.

मूर्तिजापूर तालुक्यातील लंघापूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ११ गावांना ........ दिवसाआड.

 

एकाही गावात नाही पाणीटंचाई!

यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणे, तलाव, विहिरींमध्ये लक्षणीय जलसाठा उपलब्ध असून, नदी व नाले वाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकाही गावात पाणीटंचई नाही.

 

६९९ गावांसाठी २२७ योजनांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले!

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ६९९ गावांमध्ये ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करण्यासाठी २२७ याेजनांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

 

जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत २०६ गावांत दरडाेई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करण्यात येत आहे. ५१० गावांत दरडोई प्रतिदिवस ४० लीटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी मिळत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ६९९ गावांत दरडाेई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी २२७ योजनांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले.

 ए.ए. खान उपकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद.

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूक