शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
4
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
7
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
8
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
9
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
10
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
11
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
12
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
13
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
14
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
15
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
16
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
17
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
18
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
19
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
20
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडी भाषेच्या जतनासाठी विठ्ठल वाघांनी केली पायपीट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 11:01 IST

प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ हे नाव महाराष्ट्राला नवे नाही. अकोल्यात तर नाहीच. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि प्राचार्य. श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात डॉ. वाघ १९६३-६४ या शैक्षणिक वर्षापासून प्राध्यापक होते.

- नीलिमा शिंगणे-जगड  अकोला: अवघ्या महाराष्ट्राला आपल्या कवितांनी वेड लावणारे लोककवी विठ्ठल वाघ. सिनेमा, गीत, गद्य-पद्य, ललित अशा साहित्याच्या प्रकारांमध्ये विठ्ठल वाघांनी सफर केली आहे; मात्र वºहाडी भाषा चिरकाल टिकावी, यासाठी त्यांनी पायपीट केली. वाघ यांनी जवळपास ३३ तालुक्यांचा दौरा करू न, म्हणी व शब्द गोळा केले. सुमारे २५ हजार वºहाडी शब्दांचा त्यांनी संग्रह केला आहे. वºहाडी ही मराठीची मायकूस आहे. त्यामुळे वºहाडी भाषेचा शब्दकोश तयार करण्याचे काम वयाच्या पंचाहत्तरीत डॉ. वाघ करीत आहेत, हे येथे उल्लेखनीय. आज प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांचा रविवार, १९ जानेवारी रोजी अमृत महोत्सव सोहळा साजरा होत आहे.प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ हे नाव महाराष्ट्राला नवे नाही. अकोल्यात तर नाहीच. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि प्राचार्य. श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात डॉ. वाघ १९६३-६४ या शैक्षणिक वर्षापासून प्राध्यापक होते. २००० ते २००५ पर्यंत त्यांनी प्राचार्यपद भूषविले. विद्यार्थ्यांची आपुलकीने विचारपूस करीत असल्याने आजही ते विद्यार्थीप्रिय आहेत. याची साक्ष अमृतमहोत्सवी सोहळ्याला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हजेरी लावत आहेत.वाघ यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास, भाषेची समृद्धी तिच्या शब्दसंख्येवर अवलंबून असते. ज्या भाषेत शब्द अधिक, ती भाषा समृद्ध. मराठीत सुमारे सव्वालाख शब्द आहेत. डॉ. वाघ वºहाडी भाषेचा शब्दकोश तयार करण्याचे काम सध्या करीत आहेत.सुमारे २५ हजार वºहाडी शब्दांचा संग्रह त्यांनी केला आहे. वºहाडी, अहिराणी, मराठवाडी, कोकणी अशा विविध बोलींमध्ये असलेले असंख्य शब्द प्रमाणभाषेत दिसत नाही. या शब्दाचा कोश करू शकलो, तर बोली भाषेसोबतच मराठी भाषा समृद्ध होईल. महाराष्ट्र सरकारच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने शब्दसंग्रह वाढविण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर प्रत्येक विद्यापीठाच्या आसपासच्या जिल्ह्यातील बोलीभाषेतील शब्दांचा संग्रह करण्याचे काम सुरू केले. त्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने डॉ. विठ्ठल वाघ यांची नेमणूक केली होती. वाघ यांनी ३३ तालुक्यांचा दौरा करू न, काही म्हणी व शब्द गोळा केले. वाघ यांनी अमरावती, अकोला, बुलडाणा, जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून पायी हिंडून, काव्ययात्रेतून समाजप्रबोधन केले. अमेरिका, कॅनडा या देशांत काव्यगायनाचे २२ कार्यक्रम केले. वाघ हे महाराष्ट्रातील शालेय मराठीचे पाठ्यपुस्तक बालभारतीचे संपादन प्रमुख होते.गीत, पटकथा व संवाद लेखनमराठी चित्रपट ‘अरे संसार संसार’ यामधील ‘काळ्या मातीत मातीत...तिफण चालते’ या डॉ. विठ्ठल वाघ यांच्या गीताला गीत लेखनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. देवकीनंदन गोपाला चित्रपटाचे गीत, पटकथा, संवाद लेखनास पुरस्कार, राघू मैना चित्रपटाची पटकथा, संवाद, लेखन, शंभू महादेवाचा नवस चित्रपटाचे गीत लेखन, दूरचित्रवाणीवरील काज या मालिकेचे पटकथा, संवाद लेखन, गोट्या या अजरामर मालिकेचेदेखील पटकथा आणि संवाद लेखन डॉ. वाघ यांनी केले.

संमेलनाध्यक्षपुण्याचे औंध साहित्य संमेलन, पहिले महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन, नववे कामगार साहित्य संमेलन, पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बार्शी येथे भरलेले विभागीय साहित्य संमेलन, अंबाजोगाई येथील बोली साहित्य संमेलन, मुखेड येथील मायबोली साहित्य संमेलन, देहू येथील दुसरे यशवंतराव चव्हाण ग्रामजागर साहित्य संमेलन, कारंजा लाड येथील ४५ वे विदर्भ साहित्य संमेलन, सोळावे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन, चांदुर रेल्वे येथील चौथे शब्दगंध मराठी साहित्य संमेलन, सोलापूर येथील पाहिले कृषी साहित्य संमेलन, संत गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन व अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन.

टॅग्स :Akolaअकोलाliteratureसाहित्य