शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
2
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
3
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
4
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
5
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
6
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
7
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
8
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
11
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
12
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक
13
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
14
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
15
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
16
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
17
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
18
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
19
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
20
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!

महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पास केंद्रीय जल आयोगाच्या मान्यतेची प्रतीक्षा

By admin | Published: October 12, 2015 1:44 AM

नव्या डीएसआरनुसार प्रकल्पाची किंमत सहा हजार ३४ कोटी रुपयांच्या घरात; भूसंपादन प्रक्रिया नव्याने राबविण्याच्या हालचाली.

नीलेश जोशी / खामगाव : घाटाखालील सहा तालुक्यांसहित लगतच्या अकोला जिल्ह्यातील तेल्हारा आणि बाळापूर तालुक्यातील १ लाख १ हजार ८८ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार्‍या जिगाव प्रकल्पाचा केंद्राच्या वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम (एआयबीपी) मध्ये समावेश व्हावा, यासाठी मार्च महिन्यात केंद्रीय जल आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास अद्याप अंतिम मान्यतेची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, जिगाव प्रकल्पासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये कथित स्तरावरील दोषपूर्ण कार्यवाहीमुळे नागपूर खंडपीठाने नुकताच शेतकर्‍यांच्या बाजूने निकाल दिल्याने या प्रकल्पाचे काम वेळर्मयादेत पूर्ण होतेय की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. परिणामी २0१८-१९ मध्ये जिगाव प्रकल्पांतर्गत र्मयादित स्वरूपात पाणी अडविण्याच्या हालचालींनाही त्यामुळे काहीसा खो बसण्याची साधार भीती व्यक्त केली जात आहे. या पृष्ठभूमीवर जिगाव प्रकल्प व पुनर्वसन विभागाने भूसंपादनातील त्रुटींची पूर्तता करून नव्याने भूसंपादन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती जिगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता हेमंत सोळगे यांनी दिली. सोबतच चार गावठाणांसंदर्भातील अडचणी लवकरच सोडविण्यास आमचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. १९८९ मधील मूळ प्रशासकीय मान्य ता असलेल्या जिगाव प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू असून, दरवर्षी या प्रकल्पाच्या कामासाठी अवघे २५0 कोटी राज्य शासनाकडून मिळत आहेत. याच वेगाने हे होत राहिल्यास येत्या २0 वर्षातही हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल की नाही, याबाबत शंका आहे. परिणामस्वरूप केंद्र सरकारच्या वेग वर्धित सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत या प्रकल्पाचा समावेश व्हावा, यासाठी गेल्या चार वर्षांंपासून प्रयत्न होत असून, दोन ते पाच मार्चदरम्यान त्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारच्या जलसंसाधन मंत्रालयामार्फत केंद्रीय जल आयोगाकडे पाठविण्यात आला आहे; मात्र त्यास अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नाही. या प्रकल्पाची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता ही चार हजार ४४ कोटी ११ लाख रुपयांची होती. आता नव्या डीएसआरनुसार (२0१२-१३) प्रकल्पाची ही किंमत सहा हजार ३४ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. त्यामुळे किमान पक्षी हा प्रकल्प केंद्र सरकारच्या वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रमामध्ये समाविष्ट होऊ शकतो. यासंदर्भात जिगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता हेमंत सोळगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भूसंपादन प्रक्रियेतील त्रुटी दूर करून प्रोसिजर प्रमाणे ते नव्याने करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

*१५00 कोटींचा खर्च

या प्रकल्पाचे काम २00८ पासून सुरू झाले आहे. तेव्हापासून या प्रकल्पावर मार्च २0१५ पर्यंंत १५00 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मार्च २0१४ मध्ये तो १२५0 कोटींचा होता तर मार्च २0१३ च्या अखेरीस तो १0४0 कोटी १0 लाख रुपयांचा होता. ४दिवसेंदिवस प्रकल्पाची किंमत वाढत असतानाच प्रकल्पाचे काम मात्र संथ गतीने होत आहे. जिगावचे प्रत्यक्षात ३६ टक्के (भिंतीचे) काम झाले आहे. भिंतीच्या कामासाठी लागणार्‍या ३५0 हेक्टर जमिनीपैकी ३१२ हेक्टर जमिनीची मागे सरळ खरेदी करण्यात आली होती.

* र्मयादित स्वरूपात पाणी अडविणार

      ४२0१९ मध्ये प्रकल्पामध्ये र्मयादित स्वरूपात पाणी अडविण्याचा यंत्रणेचा मानस आहे. याद्वारे परिसरातील ४0 हजार हेक्टर क्षेत्र प्रथमत: सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न आहे; मात्र प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या ३२ पूर्णत: व १५ अशंत: गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अपेक्षेप्रमाणे हाताळल्या गेलेला नाही. या गावांच्या पुनर्वसनासाठी ७३३ हेक्टर जमिनीची गरज आहे. पहिल्या टप्प्यात पाच, दुसर्‍या टप्प्यात आठ, तिसर्‍या टप्प्या त १३ आणि चौथ्या टप्प्यात १५ अंशत: बाधित गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यामुळे या गावांच्या पुनर्वसनालाही प्राधान्य हवे आहे.