शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

अकोलेकरांवर जलसंकट : ५.९९ टक्के जलसाठा जुलैपर्यंत पुरणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:51 IST

अकोला: एप्रिलअखेर जिल्ह्यातील शेकडो गावात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणातील जिवंत जलसाठ्यात मागील तीन आठवड्यांत २.५ टक्क्यांनी घट झाली.

ठळक मुद्दे आजमितीस या धरणात केवळ ५.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. बाष्पीभवन वेगाने होत असल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे.धरणातील जिवंत जलसाठा जुलैपर्यंत पुरणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला: एप्रिलअखेर जिल्ह्यातील शेकडो गावात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणातील जिवंत जलसाठ्यात मागील तीन आठवड्यांत २.५ टक्क्यांनी घट झाली. आजमितीस या धरणात केवळ ५.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. या पाण्यात आठ लाख अकोलेकरांची तहान भागणार कशी, असा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे. दुसरीकडे पाणी पुरवठ्याची कोणतीच सोय नसल्याने शहरातील नागरिकांनी मोर्चे, आंदोलनाला सुरुवात केली. महिलांनी तर लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर लोटांगण आंदोलन करू न पाणी प्रश्न सोडविण्यासाठी साकडे घातले.अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा हे एकमेव मोठे धरण असून, या धरणाच्या पाण्यावर आठ लाख अकोलेकरांची तहान भागविली जाते; पण मागील वर्षी पूरक पाऊस न झाल्याने या धरणात अल्प जलसाठा संचयित झाला. परिणामी, यावर्षी पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले. धरणांतील जलसाठ्याची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही ४३ ते ४४ अंशांपर्यंत पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे.दरम्यान,जानेवारी महिन्याच्या शेवटी काटेपूर्णा धरणात १२.८४ टक्के जलसाठा उपलब्ध होता. फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यात मात्र हा जलसाठा १०.५८ टक्के खाली आला. म्हणजे १० ते १२ दिवसांत दोन टक्केपर्यंत घट झाली. मार्च महिन्याच्या सुरुवातीला या धरणात नऊ टक्के जलसाठा शिल्लक होता, तर एप्रिल महिन्याच्या १२ एप्रिल रोजी हा जलसाठा ७.३४ टक्केपर्यंत घटला. २४ एप्रिल रोजी मात्र या धरणात ५.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. म्हणजेच बारा दिवसांत या जलसाठ्यात २.३५ टक्के घट झाली. ही घट याच वेगाने सुरू राहिल्यास या धरणातील जिवंत जलसाठा जुलैपर्यंत पुरणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

- मृत जलसाठा ११ दलघमी!या धरणात ११ दशलक्ष घनमीटर मृत जलसाठा असल्याचे सांगण्यात येत असले, तरी अर्ध्यापेक्षा जास्त त्यामध्ये गाळ आहे. त्यामुळे गाळातील पाणी जुलै महिना भागवेल, याबाबतही साशंकता आहे.

- मृतसाठा उपसणार कसा?पाणीटंचाईची भीषणता वाढली असून, जिवंत जलसाठा काही दिवसांचा शिल्लक असताना मृत जलसाठा उपसण्यासाठीची कोणती तयारी प्रशासनाने केली, असा प्रश्न अकोलेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण