शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

 वऱ्हाडातील जलसाठ्यात झपाट्याने घट;  जलसंकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 11:33 IST

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यात केवळ १९ टक्के जलसाठा शिल्लक असून, बाष्पीभवनाचा वेग सध्या १८ मि.मी. च्यावर वाढल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे.

ठळक मुद्दे पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणे मिळून केवळ १९.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यात केवळ १९ टक्के जलसाठा शिल्लक असून, बाष्पीभवनाचा वेग सध्या १८ मि.मी. च्यावर वाढल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे. परिणाम पाणी टंचाईचे संकट अधिक गडद झाले असून, टॅँकरची मागणी वाढली आहे. नागरिक पाण्यासाठी ठिकठिकाणी मोर्चे काढत आहेत. अकोल्यात आमदारांच्या निवासस्थानासमोर पाण्यासाठी लोटांगण आंदोलन केले.यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणे मिळून केवळ १९.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. दीड महिन्यात या जलसाठ्यात २८ टक्के घट झाली. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर ६.६५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे.वऱ्हाडात मोठे, मध्यम व लघू मिळून एकूण ४८४ प्रकल्प असून, नोव्हेंबर महिन्यात हा जलसाठा ४९.९७ टक्के होता. आता या सर्व प्रकल्पात आजमितीस १९.९९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. १९ एप्रिल रोजी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात ६.६५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १०.२३ टक्के, निर्गुणा २.३२, उमा धरणात केवळ शून्य टक्के जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात सध्या ७०.६७ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात १६.०८ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी ०.० टक्के आहे. पेनटाक ळी धरणात ११.२७ टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ३२.९२, मसमध्ये शून्य टक्के, कोराडी ०.८६, पलढग १३.९८, मन ११.२७, तोरणा ७.३५ टक्के, तर उतावळी धरणात ११.२७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १५.८५ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात शून्य टक्के, तर एकबुर्जी धरणात १.११ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात १४.७१ टक्के, अरुणावतीमध्ये ७.१४, तर बेंबळा धरणात १३.२० टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा या मोठ्या धरणात ४१.५५ टक्के एवढा बऱ्यापैकी जलसाठा शिल्लक आहे.

- वऱ्हाडात नऊ मोठे प्रकल्प१९ एप्रिलपर्यंत वऱ्हाडातील नऊ मोठ्या धरणात १९.९९ टक्के जलसाठा आहे. २३ मध्यम प्रकल्पात २१.९४ टक्के, तर ४५२ लघू प्रकल्पात ११.१५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या सर्व जलसाठ्यातील पाण्याची सरासरी टक्केवारी ही १९.९९ टक्के आहे. यातील लघू प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. त्यामुळे मोठे व मध्यम प्रकल्पातील पाणीच वापरले जाणार आहे. त्यामुळे १९ टक्केपेक्षा कमी जलसाठा आजमितीस शिल्लक आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीKatepurna Damकाटेपूर्णा धरणnalganga damनळगंगा धरण