शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

 अकोला जिल्ह्यातील जलसंकट तीव्र ; धरणात अल्प जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 14:01 IST

अकोला: जिल्ह्यातील उमा धरण आटले असून, उर्वरित धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उरल्याने हाहाकार माजला आहे. सूर्य ३७ ते ३९ अंशांवर पोहोचला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील काटेपूर्णा, मोर्णा, निर्गुणा या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. उमा धरण आटले असून, दगडपारवा धरणात पाणीच नाही. वाण धरण वगळता इतर धरणांत पाणी अत्यल्प उरले आहे.

अकोला: जिल्ह्यातील उमा धरण आटले असून, उर्वरित धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उरल्याने हाहाकार माजला आहे. सूर्य ३७ ते ३९ अंशांवर पोहोचला आहे. एप्रिल-मे महिन्यात ही तीव्रता ४५ अंशांवर जाते. या उन्हातच दिवसेंदिवस धरणात उरलेले पाणीही आटत चालले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलसंकट तीव्र झाले आहे. प्रशासकीय पातळीवर यासाठी कोणती ठोस पावले उचलली, असा प्रश्न जिल्हावासीयांकडून विचारला जात आहे.जिल्ह्यातील काटेपूर्णा, मोर्णा, निर्गुणा या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. उमा धरण आटले असून, दगडपारवा धरणात पाणीच नाही. काटेपूर्णा धरणातील पाणीही पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. वाण धरण वगळता इतर धरणांत पाणी अत्यल्प उरले आहे. प्रमुख धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवले असल्याने उन्हाळी पिकांना फाटा देण्यात आला आहे. आतापासूनच जिल्ह्यातील गावांत पाणी टंचाई जाणवत आहे. एप्रिल, मे महिन्यात तीव्र उन्हाळ्याला सामोरे जावे लागणार आहे. जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाला सुरुवात झाली, तरी जुलै, आॅगस्टच्या पावसाच्या जोरावर धरणे भरायला सप्टेंबर उजाडावा लागणार आहे.

मशागतीची कामे थांबली!रब्बी पिकांच्या काढणीनंतर जागोजागी नांगरटी केली जाते. जेवढे ऊन जास्त तेवढे नांगरटी केलेल्या जमिनीला फायदा मोठा होतो. यावर्षीही पावसाच्या अनिश्चिततेचे भाकीत वर्तविण्यात येत असल्याने पावसाळ्यात तरी पाऊस पडेल का, याबाबत साशंक असणाऱ्या शेतकºयांनी नांगरटी, मशागतीची कामे थांबविली आहेत.

 काटेपूर्णा धरणात अल्प जलसाठासात लाखांवर लोकसंख्या असलेल्या अकोलेकरांची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्णा धरणात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक असून, यात अर्धा गाळ असल्याने या धरणातील जलसाठ्याने तळ गाठला आहे. पाणी कमी असल्याने अगोदरच या धरणातून मूर्तिजापूर, साठ खेडी व अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी नाकारले आहे; पण या धरणातील अल्प पाण्यात पुढील सप्टेंबरपर्यंत अकोलेकरांची तहान भागेल का, असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे. 

धरणातील उपलब्ध जलसाठाकाटेपूर्णा - १०.९ टक्केमोर्णा - १२.८१ टक्केनिर्गुणा - २०.५९ टक्केउमा - ०.० टक्केदगडपारवा - ०.० टक्केवाण - ७७.९१ टक्के

 काटेपूर्णा धरणात १० टक्के एवढा जिवंत; परंतु अल्प जलसाठा आहे. त्यानंतर मृतसाठा उचलता येईल. यात गाळही आहे. त्यामुळे पाण्याचे आता काटेकोर नियोजन करावे लागणार असून, पाण्याचा अपव्यय टाळावा लागेल.जयंत शिंदे,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणWaterपाणी