शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

३७३ मागास वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याची कामे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 14:59 IST

जिल्हा परिषदेतील सर्वच विभागाचे अभियंता गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन अंदाजपत्रक तयार करणार आहेत.

अकोला: सामाजिक न्याय विभागाकडून मागासवस्ती विकास योजनेसाठी देण्यात आलेला ४९ कोटी रुपये निधी प्राधान्याने पाणीपुरवठा योजना, संबंधित सोयी-सुविधेसाठीच खर्च करण्याचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्ह्यातील ३७३ वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याशी संबंधित सोयी-सुविधा निर्मितीसाठी जिल्हा परिषदेतील सर्वच विभागाचे अभियंता गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन अंदाजपत्रक तयार करणार आहेत. पुढील शनिवारी कामांची अंतिम निवड केली जाणार आहे, असेही मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, समाजकल्याण अधिकारी वसतकार उपस्थित होते.सामाजिक न्याय विभागाकडून मागास वस्तीमध्ये विकास कामांसाठी दरवर्षी निधी दिला जातो. निधी खर्च करण्यासाठी आधी मागास वस्त्यांची स्थान निश्चिती करून त्यामध्ये कामांचा आराखडा मंजूर केला जातो. जिल्हा परिषदेत २०१८-२०२३ पर्यंतचा मागास वस्ती विकास आराखडा विभागीय आयुक्तांनी मंजूर केला आहे. त्या आराखड्यानुसारच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १,८६७ मागास वस्त्यांमध्ये विकास कामे करता येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या सभेत प्रशासक आयुष प्रसाद यांनी गेल्या १० वर्षात एकदाही निधी न मिळालेल्या वस्त्यांची नावे निश्चित केली. त्यामध्ये ३७३ वस्त्या आहेत. त्या वस्त्यांमध्ये १ लाख ७५ हजार लोकसंख्येसाठी प्राधान्याने पाणीपुरवठ्याची कामे केली जातील. वस्त्यांमध्ये अभियंत्यांच्या प्रत्यक्ष भेटीतून तयार होणारे अंदाजपत्रक शनिवारी बैठकीत मंजूर होणार आहे.

डॉ. आंबेडकर पाणी सत्याग्रह योजनामागास वस्ती विकास योजनेतून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या कामांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणी सत्याग्रह योजना’ असे नाव दिले जाणार आहे. योजनेतून वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष पाणीपुरवठा करणे, आधीच पुरवठा होत असल्यास प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करणे, तेही असल्यास पाणी शुद्धीकरण यंत्र उभारण्याची कामे केली जाणार आहेत.

लोकप्रतिनिधींच्या मागण्यांचा पुढील वर्षी विचारविशेष म्हणजे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावांमध्ये कोणती कामे प्राधान्याने करावयाची आहेत, याची माहिती लोकप्रतिनिधींकडून मागवली होती. त्यानुसार अनेकांनी पत्र देत कामे सुचवली. त्या सूचना चालू वर्षाच्या नियोजनात बाजूला ठेवण्यात आल्या आहेत. पुढील वर्षाच्या नियोजनात त्यावर विचार केला जाईल, असेही आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.

त्या वस्त्या राहणार वंचितसमाजकल्याण विभागाने २००३-०४ व २००४-०५ या वर्षात मागास वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यापैकी कोणत्याही गावात योजना सुरू नाहीत. त्यातून पाणीही मिळत नाही. तरीही त्या गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेवर आधीच खर्च झाल्याने आता निधी दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद