शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘अवकाळी’च्या तडाख्यात २६ गावांत ४४८ हेक्टरवरील गव्हाचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 11:22 IST

२६ गावांत ४४८ हेक्टरवरील गहू पिकाचे नुकसान झाले आहे.

अकोला : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात रविवारी जिल्ह्यातील बार्शीटाकळी आणि पातूर या दोन तालुक्यांत २६ गावांमध्ये ४४८ हेक्टरवरील गहू पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवारी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला.जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत रविवार, १ मार्च रोजी रात्री वादळी वाºयासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. अवकाळी पावसाच्या तडाख्यात रब्बी हंगामातील गहू, काढणीला आलेला हरभरा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढणीला व कापणीला आलेल्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने, शेतकरी हवालदिल झाला. जिल्ह्यातील बार्शीटाकळी व पातूर तालुक्यातील पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांमार्फत सोमवार, २ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार दोन्ही तालुक्यातील २६ गावांत ४४८ हेक्टरवरील गहू पिकाचे नुकसान झाले आहे.त्यानुसार जिल्ह्यातील बार्शीटाकळी व पातूर या दोन तालुक्यातील पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल २ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला.

पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश!अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील बार्शीटाकळी व पातूर या दोन तालुक्यात २६ गावांमध्ये गहू पिकाचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून, दोन्ही तालुक्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरBarshitakliबार्शिटाकळीFarmerशेतकरीagricultureशेती