शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बेताल वक्तव्याचा हिशेब चुकता करण्याची संधी भाजप घेईल का?

By राजेश शेगोकार | Updated: August 26, 2021 10:43 IST

BJP Akola : भूमिका घेण्याची जबाबदारी त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्यावर देत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले

ठळक मुद्देआ. देशमुखांचे आंदाेलनात राणेंबद्दल अनुदगार बावनकुळे म्हणतात सावरकर बाजू तपासतील

-  राजेश शेगाेकार

अकाेला : नारायण राणे यांच्या अटकेच्या निमित्ताने रंगलेल्या राजकीय नाट्यात मंगळवारी अकाेल्यात झालेल्या आंदाेलनात शिवसेनेेचे आमदार व जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी नारायण राणे यांच्यावर चांगलेच ताेंडसुख घेतले. दरम्यान, यासंदर्भात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा केली असता कायदेशीर बाजू तपासून भूमिका घेण्याची जबाबदारी त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्यावर देत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे बेताल वक्तव्याचा हिशेब चुकता करण्याची संधी भाजप घेईल का? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या बेताल वक्तव्याबाबत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे राज्यभरात चांगलेच राजकारण तापले असून, शिवसेना व भाजप हे दाेन्ही पक्ष रस्त्यावर आले आहेत. शिवसेनेेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख हे आमदार झाल्यापासून अधिक आक्रमक झाले असून, त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात संख्येने मजबूत असलेल्या भाजपाला थेट शिंगावर घेण्याची भूमिका घेतली आहे. जिल्हा नियाेजन समितीमधील निधीची फिरवाफिरव असाे की महानगरपालिकेतील भाजपाचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी आपल्या शिलेदारांना दिलेले पाठबळ असाे. आ. देशमुखांनी भाजपाला काेंडीत पकडण्याची एकही संधी साेडलेली नाही. त्यांच्या हा आक्रमकपणा मंगळवारी सेनेने काढलेल्या माेर्चातही चांगलाच समाेर आला. त्यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या भाषेत ताेंडसुख घेतले. राणे यांच्या उंचीपासून तर थेट त्यांना प्राण्याची उपमा देण्यापर्यंत ते आक्रमक हाेते. आंदाेलनात त्यांनी काढलेले अनुद्गार आता चांगलेच व्हायरल झाले आहे. एकीकडे राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विराेधात केलेल्या वक्तव्यावरून थेट अटक करून कायदेशीर मार्ग स्वीकारल्याचे शिवसेनेने प्रथम दर्शनी दाखवून दिले आहे, त्यामुळे आता इतर पक्षांसाठी हाच मार्ग खुला झाला आहे. बुधवारी भाजपाचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबतच छेडले असता त्यांनी सदर विधाने तपासून रीतसरपणे कायदेशीर सल्ला घेण्यात आल्यावर कारवाई केली जाईल, त्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर पुढाकार घेतील, असे स्पष्ट केल्याने जिल्हाध्यक्ष म्हणून आ. रणधीर सावरकर यांची जबाबदारी वाढली आहे. आ. सावरकर हे सध्या अकाेल्यातील भाजपाचा आक्रमक चेहरा आहेत. जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण जिल्ह्यात पक्षबांधणी करताना ते सामान्य कार्यकर्त्यांसाठी काेणत्याही सरकारी अधिकाऱ्यासाेबत थेट भिडतात. त्यामुळे त्यांचा आक्रमकपणा सेनेच्या बाबतीत कितपत प्रखर हाेताे, यावर पुढचे राजकारण रंगणार आहे. राजकारणात टीका करताना अनेकांचा ताेल सुटल्याची उदाहरणे आहेत. मात्र, अशा वक्तव्याबाबत थेट अटकेची कारवाई करण्याची सुरुवात सेनेने केली असल्याचे विधान भाजपाच्या सर्वच नेत्यांकडून प्रसारित हाेत आहे. त्यामुळे सेनेच्या कारवाईचा हिशेब अकाेल्यात चुकता करण्याची संधी भाजपा घेईल का? हा प्रश्न या निमित्ताने समाेर आला आहे.

युतीची शक्यता धूसरच

गेल्या विधानसभा निवडणुकी भाजप शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवत अकाेल्यात शतप्रतिशत यश मिळविले. पाचपैकी चार मतदारसंघ भाजपाने तर एक शिवसेनेने जिंकला. युतीची एकत्रित मते विभाजित न झाल्याचा फायदा भाजप, सेना या दाेन्ही पक्षांना झाला. मात्र, महाविकास आघाडीच्या निमित्ताने या दाेन पक्षांतील मतभेद वाढतच गेले असले तरी सामान्य कार्यकर्त्यांना युती हाेईल, असे वाटत हाेते. राणे प्रकरणानंतर आता सेना-भाजपातील दरी आणखी रुंदावली असून, या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याची संधी दाेन्ही पक्ष साेडणार नाहीत. त्यामुळे युतीची शक्यता आता धूसरच असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणेNitin Deshmukhनितीन देशमुखRandhir Savarkarरणधीर सावरकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा