शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

शाळा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:21 AM

शासनाने बाजारपेठ, सिनेमागृह, जलतरण तलाव अशी गर्दीची ठिकाणे सुरू केली आहेत. मग शाळा का नाहीत? शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे ...

शासनाने बाजारपेठ, सिनेमागृह, जलतरण तलाव अशी गर्दीची ठिकाणे सुरू केली आहेत. मग शाळा का नाहीत? शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करावी, अशी मागणी करीत शिक्षक समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात येणार आहे.

इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद आहे. काही ठिकाणी शिक्षक उपस्थिती ५० टक्के आहे तर काही ठिकाणी १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती आहे. अनेक सामाजिक संघटना आणि शिक्षण तज्ज्ञ शाळा सुरू करण्याबाबत आग्रही आहेत. विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. परंतु, तथाकथित अनेक समाजसेवक शिक्षकांनाच शाळा नको, अशी गरळ ओकण्यासाठी पुढे सरसावत आहेत; त्यातून शिक्षकांची बदनामी होत आहे. त्यामुळे आता तत्काळ शाळा उघडणे अत्यंत गरजेचे आहे. याचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाला अनेकदा निवेदने दिली आहेत. परंतु, शासनाने त्याकडे दुर्लक्षच केले. आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आदींच्या माध्यमातून आणि संपर्कातील विविध मान्यवरांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना शीघ्रतेने शाळा सुरू करण्यासाठी विनंती वजा मागणीचे पोस्ट कार्ड पाठविण्यात येणार आहेत.

विद्यार्थी, पालक, शिक्षकांना आवाहन

प्राथमिक शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने पोस्ट कार्ड खरेदी करून जास्तीत जास्त पोस्ट कार्ड मुख्यमंत्री महोदयांना पाठवावे. असे आवाहन शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय टोहरे, शिक्षक नेते गोपाल सुरे, जिल्हाध्यक्ष मारोती वरोकार, जिल्हा सरचिटणीस राजेश देशमुख, कार्याध्यक्ष अरविंद गाडगे आदींनी केले आहे.