शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
3
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
4
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
5
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
6
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
7
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
8
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
9
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
10
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
11
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
12
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
13
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
14
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
15
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
16
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
17
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
18
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
19
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
20
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

नाफेडच्या हरभरा खरेदीला मुदतवाढ रणजित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

By admin | Published: May 20, 2014 11:32 PM

अकोला : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना वेळेवर मदत न देणार्‍या शासनाने शेतकर्‍यांना पूर्वसूचना न देताच नाफेडची हरभरा खरेदी बंद केली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आ. डॉ. रणजित पाटील यांनी कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात हरभरा खरेदी सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. डॉ. पाटील यांच्या इशार्‍यानंतर नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली आहे.

अकोला : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना वेळेवर मदत न देणार्‍या शासनाने शेतकर्‍यांना पूर्वसूचना न देताच नाफेडची हरभरा खरेदी बंद केली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आ. डॉ. रणजित पाटील यांनी कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात हरभरा खरेदी सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. डॉ. पाटील यांच्या इशार्‍यानंतर नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली आहे.आधीच गारपीट व अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना कोणतीही पूर्वसूचना न देता नाफेडने १० मेपासून हरभरा खरेदी बंद केली होती. हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकर्‍यांच्या संकटात आणखी भर टाकण्याचा प्रताप नाफेडने केला होता. या प्रकारामुळे शेतकर्‍यांसमोर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकर्‍यांना अणखी एका संकटाचा सामना करावा लागत असताना आ. डॉ. रणजित पाटील यांनी दोन दिवसात हरभर्‍याची खरेदी सुरू न केल्यास शेतकर्‍यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा कृषीमंत्री शरद पवार यांना दिला होता. यासोबतच शासनाला पत्र पाठवून हरभरा खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. आ. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली आहे. नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ देण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर कुंभकर्णी झोपेत असलेल्या यंत्रणेने मुदतवाढ देण्याची कुठलीही माहिती शेतकर्‍यांना दिली नाही. वृत्तपत्रातून जाहिरात किंवा इतर कुठल्याही मार्गाने नाफेडने हरभर्‍याच्या खरेदीला मुदतवाढ मिळाल्याची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविली नाही. याबाबत डीएमओ यांच्याशी डॉ. रणजित पाटील यांनी संपर्क साधला असता यंत्रणेकडून निर्देश मिळाल्यानंतरही काही केंद्रांवर अद्यापही हरभरा खरेदी सुरू करण्यात आली नसल्याची त्यांना माहिती मिळाली. या कार्यालयातील कारभार पुरता ढेपाळला असून, शेतकर्‍यांविषयी कुठलाही कळवळा या कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना नसल्याचा आरोपही आ. डॉ. रणजित पाटील यांनी केला आहे.** तुरीचे चुकारे तत्काळ द्या - आ. पाटीलशेतकर्‍यांचे तुरीचे चुकारे मागील तीन महिन्यांपासून देण्यात आलेले नसून, हे चुकारे तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी डॉ. रणजित पाटील यांनी केली आहे. थकीत असलेले तुरीचे चुकारे खरीप पेरणीच्या आधी देऊन शेतकर्‍यांना मदत करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणीही त्यांनी केली.