शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

तुरीचे भाव गेले १0 हजार रुपये क्विंटलवर!

By admin | Published: August 16, 2015 11:52 PM

जेवणामध्ये डाळीचाआस्वाद होणार महाग !

अकोला : तुरीचे भाव अचानक वधारले असून, १0 हजार रुपये क्विंटलप्रमाणे बाजारात खरेदी सुरू आहे. तुरीचे भाव वधारल्याने तूर डाळीच्या दरात प्रतिक्विंटल १0 ते १२ हजार रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे गरीब, सामान्य लोकांना जेवणामध्ये डाळीचा आस्वाद घेणे कठीण झाले आहे. देशात गरजेएवढे तुरीचे उत्पादन होत नसल्याने डाळवर्गीय पिकात तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या डाळवर्गीय उत्पादन संचालनालयाने या पिकाच्या लागवडीवर भर दिला आहे. या डाळीत प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने ग्रामीण, आदिवासी भागातील जनतेला तूर डाळ मिळण्यासाठी बिल गेटस फाउंडेशनने देशातील काही विद्यापीठांना निधी उपलब्ध केला होता. यात अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठालाही निधी उपलब्ध करू न दिला होता, असे असले तरी आजमितीस देशात तुरीचे एकूण क्षेत्र हे ३९ लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्रात हे क्षेत्र ११ लाख हेक्टर आहे. पण उत्पादकतेचे प्रमाण कमी आहे. देशातील तुरीच्या डाळीची गरज भागविण्यासाठी या डाळीची आयात ब्रह्मदेशातून करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या तुरीचा पुरवठा कमी झाला असून, मागणी मात्र वाढल्याने तुरीच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यात तुरीचे भाव ४३00 रुपये प्रतिक्विंटल होते. यंदा सुरुवातच साडेसहा हजार रुपये क्विंटलने झाली. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ही वाढ ७ हजार ते ८ हजार ७00 पर्यंत पोहोचली होती, तर १४ ऑगस्ट रोजी हे दर ९,२00 रुपयांच्यावर पोहोचले होते. दरम्यान, तुरीचे दर अचानक वाढल्याने तूर डाळीच्या दरातही वृद्धी झाली असून, तूर डाळीचे प्रतिक्विंटल भाव आजमितीस १0 ते १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या दरवाढीमुळे गोरगरीब, सामान्याच्या आहारातून तूर डाळ बाद झाली आहे.

*डाळीचे उत्पादन घटले!

           मागील वर्षी अल्प पावसाचा फटका बसल्याने तुरीचे उत्पादन घटले आहे. केवळ कर्नाटक राज्यात चांगले उत्पादन झाल्याने आजपर्यंत देशात भाव स्थिर होते. मागणी वाढली असून, पुरवठा कमी आहे. आता विदेशातील दोनच कंपन्यांकडे तूर आहे.