शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
5
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
6
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
7
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
9
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
10
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
11
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
12
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
13
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
14
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
15
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
16
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
17
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
18
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
19
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
20
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

जिल्हा परिषदांमध्ये आदिवासी विकास समिती हवी  - अंजली आंबेडकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 5:34 PM

समाजकल्याणप्रमाणेच आदिवासी विकास समिती जिल्हा परिषदांमध्ये असायला हवी, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले.

अकोला : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सामाजिक विकास साधण्यासाठी लोक निर्णयानुसार निधी खर्च करता येतो. त्याचवेळी आदिवासी समाजातील विकास योजना योजनांचा निधी खर्च करण्यातही लोकसहभाग वाढावा, यासाठी समाजकल्याणप्रमाणेच आदिवासी विकास समिती जिल्हा परिषदांमध्ये असायला हवी, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले. त्यासाठी जिल्हा परिषदेने तसा ठराव शासनाकडे पाठवावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.जिल्हा परिषदेच्या पदग्रहण कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. मंचावर प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, राज्य प्रवक्ता राजेंद्र पातोडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रमोद देंडवे यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना त्यांनी बलवंतराय मेहता कमिटीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरणाची शिफारस केली. त्यानुसार ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी निधी खर्च प्रक्रीयेत लोकसहभाग वाढवण्यात आला. त्यासाठी लोकांमधून निवड केलेल्या प्रतिनिधींमार्फत विकासाचे नियोजन, खर्चावर नियंत्रण तसेच गरजेनुसार विकास कामे करता येतात. हे असले तरी राज्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. त्या समाजाचा विकास करण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दिली जाते. त्यांच्यासोबत लोकसहभागाची जोड देणे महत्त्वाचे आहे. आदिवासींचा विकास साधण्यासाठी लोकांच्या माध्यमातून आणि निर्णय प्रक्रीयेतून तो व्हावा, अशी व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.जिल्हा परिषदांमध्ये समाजकल्याण समिती आहे. त्या सोबतीला आदिवासी विकास समितीही अस्तित्त्वात आल्यास त्या समाज घटकाचा विकास आणखी प्रभावीपणे करता येईल, असा आशावाद व्यक्त केला. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास समिती गठित करण्याचा ठराव घ्यावा, तो शासनाकडे सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद