शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
2
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
3
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
4
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
5
Noel Tata Net Worth: रतन टाटांचे उत्तराधिकारी बनलेल्या नोएल टाटांची नेटवर्थ किती, कुटुंबात कोण-कोण आहेत? जाणून घ्या
6
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
8
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
9
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
10
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
11
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
12
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
13
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
14
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
15
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
16
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
17
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
18
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
19
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
20
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना मिळणार पुरस्कार!

By admin | Published: August 21, 2015 1:10 AM

राज्याला २ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर.

अकोला : यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी ९१ लाख रुपयांचा निधीची तरतुद १२ ऑगस्ट रोजी करण्यात आली. पुढील वर्षांंतील १२ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था ग्राम विकासासाठी मोलाची कामगिरी करीत आहेत. ग्राम विकासाच्या योजना स्वराज्य संस्था ग्रामीण भागात राबवित आहेत. म्हणूनच शासनाच्या पंचायत विभागातर्फे या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी मागील २00६ पासून, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविले जात आहे. राज्य आणि विभाग स्तरावर उत्कृष्ट काम करणार्‍या स्वराज्य संस्थांचा यात समावेश असतो. यात अशा जिल्हा परषिद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना रोख रक्कम देऊनही प्रोत्साहित करण्यात येत असते. राज्यातील अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी क रू न जनतेला शासनाच्या सेवा पुरविल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतींनी गोदरीमुक्त गावासह गावात अनेक विकासाची कामे केली आहेत. त्या सर्व पंचायत राज संस्थांना केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. निर्मल ग्राम योजनेंतर्गत विकासाची कामे राबविण्यात आली आहेत.