शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

जि.प. इमारतही ‘फायर ऑडिट’विना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:46 IST

संपूर्ण जिल्हय़ाचा कारभार हाकणार्‍या  जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत आगीसारख्या  आपत्तीपासून सुरक्षित नसल्याचे बुधवारी केलेल्या  स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले. विशेष म्हणजे, चार  मजली प्रशासकीय इमारतीत असलेल्या चार विभागा तील रेकॉर्ड आणि अधिकारी-कर्मचार्‍यांचे जीवि त्वही त्यातून धोक्यात असल्याचे चित्र आहे. जिल्हा  परिषदेला आयएसओ मानांकन मिळाले त्यावेळी  लावलेले अग्निशमन यंत्र अद्यापही तसेच आहेत.  आपत्तीमध्ये त्याचा उपयोग होईल की नाही, ही  बाबही कुणीच छातीठोकपणे सांगू शकले नाही.

ठळक मुद्देप्रशासकीय इमारतही मोडकळीला अधिकार्‍यांसह पदाधिकार्‍यांचेही दुर्लक्ष!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संपूर्ण जिल्हय़ाचा कारभार हाकणार्‍या  जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत आगीसारख्या  आपत्तीपासून सुरक्षित नसल्याचे बुधवारी केलेल्या  स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले. विशेष म्हणजे, चार  मजली प्रशासकीय इमारतीत असलेल्या चार विभागा तील रेकॉर्ड आणि अधिकारी-कर्मचार्‍यांचे जीवि त्वही त्यातून धोक्यात असल्याचे चित्र आहे. जिल्हा  परिषदेला आयएसओ मानांकन मिळाले त्यावेळी  लावलेले अग्निशमन यंत्र अद्यापही तसेच आहेत.  आपत्तीमध्ये त्याचा उपयोग होईल की नाही, ही  बाबही कुणीच छातीठोकपणे सांगू शकले नाही.मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर सर्वच  शासकीय कार्यालयांमध्ये आगीची प्रतिबंधात्मक उ पाययोजना असणे बंधनकारक करण्यात आले,  तसेच इमारत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत  आहे, त्या संस्थेकडून फायर ऑडिट करून घेणेही  आवश्यक आहे. प्रशासकीय कामकाज आणि  दैनंदिन जनसंपर्क असलेल्या ठिकाणी या दोन्ही बाबी  कटाक्षाने पाळण्याची गरज असताना जिल्हा  परिषदेच्या बांधकाम विभागाने त्याकडे कमालीचे  दुर्लक्ष केल्याचे बुधवारी ‘स्टिंग ऑपरेशन’दरम्यानच्या  पाहणीत दिसून आले. 

लघुसिंचन, पशुसंवर्धन मध्ये तोच प्रकारत्यानंतर दोन मजली असलेल्या इमारतीतही तोच  प्रकार पाहायला मिळाला. त्यामध्ये लघुसिंचन  विभाग, त्यावर पशुसंवर्धन, तिसर्‍या माळ्यावर  रोजगार हमी योजना कार्यालयातही अग्निशमन  यंत्राबाबत अनभिज्ञता दिसून आली. केवळ भिंतीची  शोभा वाढवणारीच ती यंत्रे असल्याचे दिसत आहे.  त्याचा उपयोग कोणी, कधी केला, याबाबत बांधकाम  विभागासोबतच त्या-त्या विभागातील अधिकारी- कर्मचार्‍यांना माहिती नसल्याचे उघड झाले. 

इतर इमारतींही धोक्यातप्रशासकीय इमारतीसह परिसरात असलेल्या इतर  इमारतींची अवस्थाही त्यापेक्षा बरी नाही. त्यामध्ये  महिला व बालकल्याण विभाग, अतिरिक्त मुख्य  अधिकारी यांचा कक्ष, समाजकल्याण विभाग,  त्यालगतचे सभापतींचे कक्ष, अध्यक्ष, उपाध्यक्षांचा  कक्ष, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषदेचे  सभागृह, त्यालगतचा पंचायत विभाग, विरोधी पक्षने ता कक्ष, कृषी, अर्थ विभागाच्या सभापतींचे कक्ष,  त्यावरचा अर्थ विभाग, बांधकाम विभागाच्या  कार्यकारी अभियंता कार्यालयातही या आपत्तीबाब तच्या जागरूकतेऐवजी प्रचंड अनास्था दिसून आली. 

चार मजली प्रशासकीय इमारतही धोक्यातजिल्हा परिषदेचे महत्त्वाचे चार विभाग असलेली  पूर्वेकडील चार मजली इमारतही धोक्यात आहे. या  इमारतीत ये-जा करण्यासाठी अरुंद पायर्‍यांची सोय  आहे. एकावेळी दोन व्यक्तीच त्या पायर्‍यांवरून ये- जा करू शकतात. सर्वात वरच्या मजल्यावर  असलेल्या पाणीपुरवठा विभागापर्यंत त्या आणखी  अरुंद होत जातात. त्यामुळे आगीसारखी एखादी आ पत्ती ओढवल्यास मोठा अनर्थ घडू शकतो, हेही  यानिमित्ताने दिसून आले. 

शिक्षण विभागात प्रचंड राबतातिसर्‍या मजल्यावर असलेल्या शिक्षण विभागात  दिवसभर भेट देणार्‍यांचा राबता असतो. त्यातच या  विभागात संपूर्ण जिल्हय़ातील शिक्षकांच्या  सेवासंदर्भातील रेकॉर्ड आहे. सर्वच खोल्यांमध्ये  कागदपत्रे खच्चून भरलेली आहेत. आगीच्या घटनेत  ती सर्व भक्षस्थानी ठरतील, अशीच परिस्थिती आहे.  आपत्तीचा विचार करता या विभागातही असलेल्या  अग्निशमन यंत्रांच्या उपयोगीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण  झाले आहे.