शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

वादळी पावसाने महावितरणला दिला १.२५ कोटींचा शॉक; ८१४ विद्युत खांब कोसळले, ६० किलोमीटर वीज वाहिन्या क्षतीग्रस्त

By उज्वल भालेकर | Updated: April 11, 2024 18:52 IST

या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा चांदूर बाजार आणि भातकुली तालुक्यात बसला असून जवळपास १.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

अमरावती : जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या वादळाचा सर्वात जास्त फटका महावितरणला बसला आहे. अनेक भागांमध्ये झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडल्याने शेकडो गावातील वीज पुरवठा खंडित झाला. या पावसामुळे ८१४ वीज खांब कोसळले असून ६० किलोमीटर पर्यंतच्या विद्युत वाहिन्या क्षतीग्रस्त झाल्या आहेत. या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा चांदूर बाजार आणि भातकुली तालुक्यात बसला असून जवळपास १.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. यामध्ये महावितरणलाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. आकाशातील वीज आणि महावितरणची वीज यंत्रणा यामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन अनेक वीज वाहिन्यावरील इन्सुलेटर फुटले तसेच उपकेंद्रात तांत्रिक दोष निर्माण झाले. याचबरोबर काही ठिकाणी वादळाच्या प्रचंड दबावामुळे झाडे उन्मळून वीज वाहिन्यावर पडली होती. परिणामी महावितरणची ९ उपकेंद्रे आणि ३७ फिडर पूर्णत: बंद पडले होते. चांदूर बाजार परिसरात महावितरणचे उच्चदाबाचे २४१ आणि लघुदाबाचे ४२४ वीज खांब कोसळले. यामुळे साडेसतरा किलोमीटर उच्चदाब आणि ३० किलोमीटर लघुदाबाच्या वीज वाहिन्या क्षतिग्रस्त झाल्या. त्याचबरोबर ५ रोहित्रात तांत्रिक दोष निर्माण होऊन नादूरुस्त झाले. तर ४ रोहित्रे जमिनीवर खाली पडून नुकसान झाले. तसचे भातकुली परिसरातही ३३ उच्चदाबाचे आणि ७९ लघुदाबाचे वीज खांब कोसळले असून ९ किमी वीज वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. अचलपूर विभागात उच्च आणि लघुदाब वर्गवारीतील ३२ वीज खांब कोसळले असून २ किलोमीटर वीज वाहिन्या क्षतिग्रस्त झाल्या आहेत. तसेच दोन रोहित्रे नादुरुस्त झाली आहेत. तर अमरावती शहरात ७ वीजेचे खांब कोसळले असून १ रोहित्र खाली पडले आहे. ३ रोहित्रात तांत्रिक दोष निर्माण होऊन निकामी झाले झाल्यामुळे महावितरणला १.२५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

याठिकाणचा वीज पुरवठा झाला सुरळीतवादळ थांबताच महावितरणने टप्प्या- टप्प्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु केले. जेथे शक्य झाले त्या ठिकाणी उपकेंद्राला बॅक फिडींगने वीज पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेल्या ३३ केव्ही पाडा, ३३ केव्ही घाटलाडकी, ३३ केव्ही खोलापूर,३३ केव्ही आमला,३३ केव्ही ब्राम्हणवाडा,३३ केव्ही तोंडगाव, ३३ केव्ही खल्लार,३३ केव्ही चांदस वाटोडा आणि ३३ केव्ही टाकरखेडा या उपकेंद्राचा आणि त्या उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या तसेच या उपकेंद्रातून वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या ३७ वीज वाहिन्यांचा बंद पडलेला वीज पुरवठा सुरु करण्यास महावितरणला यश आले आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज