शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

चार दिवसांत अतिवृष्टीचे १० बळी, २.२६ लाख हेक्टर बाधित

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: September 06, 2024 6:31 PM

पावसाने नुकसान : २०३ जनावरांचा मृत्यू, ९२९ घरांची पडझड

गजानन मोहोड

अमरावती : चार दिवसांतील मुसळधार पाऊस व अतिवृष्टी यामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरात १० व्यक्ती वाहून गेल्या व लहानमोठे २०३ पशुधन मृत झाले. पुराच्या पाणी शेतात शिरल्याने, शेतात तलाव साचल्याने व बांध फुटल्यानेही २.२६ लाख हेक्टरमधील कपाशी, तूर व सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्तांचा अहवाल आहे. या आपत्तीमध्ये पश्चिम विदर्भात ३३ तालुक्यांतील १६१७ गावे बाधित झालेली आहेत.

विभागामध्ये ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात १४ तालुके, बुलडाणा ३ व वाशिम जिल्ह्यात १ अशा २० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. शिवाय कित्येक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात ११२ कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे.या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना आलेल्या पुरात अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यांत प्रत्येकी २, बुलडाणा ३ व वाशिम जिल्ह्यात १ अशा १० व्यक्ती पुरात वाहून गेल्याने मृत झाल्या आहेत. शिवाय ३५ मोठे व १६८ लहान अशा २०३ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. या आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात ६६५, वाशिम १५६, अकोला ८२ व बुलडाणा जिल्ह्यात २६ घरांची पडझड झालेली आहे.

पुराने शेती खरडली, शेतांचे झाले तलावचार दिवसांतील मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे २,२६,०६६ हेक्टरमधील कपाशी, तूर व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात १,७१,६०६ हेक्टर, अकोला ४१,८८०, बुलडाणा ११,६००, अमरावती ५५७ व वाशिम जिल्ह्यात ४०७ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. शासनादेशानुसार अतिवृष्टीने बाधित पिकांचे सर्वेक्षण कृषी व महसूल यंत्रणांद्वारा करण्यात येत आहे.

टॅग्स :floodपूरfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती