शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

२० हजार हेक्टर बाधित

By admin | Published: March 02, 2016 12:48 AM

जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे १९ हजार ६०५ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

गारपिटीचा तडाखा : तीन दिवसांतील नुकसान, बाधित क्षेत्र वाढणार अमरावती : जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे १९ हजार ६०५ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी रात्रीपर्यंत सुरू असलेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यात १० हजार ५७७ हेक्टरमधील पिके नेस्तनाबूत झाली आहेत. रबीचा हंगाम संपताना आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा खरिपाचा हंगाम अपुऱ्या पावसामुळे उद्ध्वस्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रबी हंगामावर होती. सद्यस्थितीत जिल्ह्यात दीड लाख हेक्टरमधील रबीची पिकेसुस्थितीत असताना वादळी पाऊस व गारपिटीने ६ हजार ७६१ हेक्टर क्षेत्रातील गहू, २ हजार ७४४ हेक्टरमधील हरभरा, १ हजार ५६७ हेक्टरमधील भाजीपाला, ८ हजार ९३ हेक्टरमधील फळपिके व १४० हेक्टरमधील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असलेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात ९ तालुक्यांमधील शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाच्या मदतीकडे डोळे लागले आहेत. ंअंतिम अहवालाची प्रतीक्षाअमरावती : यामध्ये अमरावती तालुक्यात १ हजार ५२७ हेक्टर, वरुड ३४ हेक्टर, चांदूरबाजार ३ हजार ८४४ हेक्टर, अचलपूर २ हजार १४३ हेक्टर, भातकुली १०७ हेक्टर, धामणगाव २ हजार ४७३ हेक्टर, चांदूररेलवे २८४ हेक्टर, तिवसा ८४ हेक्टर व चिखलदरा तालुक्यात ८० हेक्टर शेतीपिक व फळपिकांचे नुकसान झाले आहे. सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे २३९ गावांमधील ६ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या ४ हजार २३२ हेक्टरमधील गहू, १ हजार ६४७ हेक्टरमधील हरभरा, ५ हेक्टरमधील कपाशी, ४६२ हेक्टरमधील भाजीपाला, ३ हजार ९०१ हेक्टरमधील फळपिके व ४५ हेक्टरमधील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तीन दिवसांत चांदूरबाजार तालुक्यात सर्वाधिक ११ हजार ४५२ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक सर्वेक्षणाअंती १९ हजार ६०५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अहवाल असला तरी अंतिम अहवालात गारपिटीच्या नुकसानीची क्षेत्रवाढ होणार आहे. (प्रतिनिधी)