शहरं
Join us  
Trending Stories
1
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
2
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
3
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
5
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
6
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
7
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
8
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयोवृद्ध बॅटर
9
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
10
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
11
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
12
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
13
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 
14
Rohit Sharma Records, IND vs NZ 1st Test: रोहित शर्माचे फक्त ५ षटकार अन् बनणार भारताचा 'सिक्सर किंग'; या दिग्गजाचा विक्रम धोक्यात
15
Nanded Lok Sabha Bypoll 2024 Date: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा; निकाल कधी?     
16
आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि कधीपासून लागू होते? जाणून घ्या सविस्तर...
17
निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका
18
100 KM वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या आपत्कालीन खिडकीतून चिमुकली बाहेर उडून पडली; पुढे...
19
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती, या नेत्यांकडे सोपवली विभागनिहाय जबाबदारी 
20
“विधानसभेलाही मराठवाड्यात मनोज जरांगेंचा इफेक्ट दिसेल, मविआ उमेदवार जिंकतील”: बजरंग सोनावणे

मानव- वन्यजीव संघर्षात विदर्भ ‘हॉट’; वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात २५ जण लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 12:36 PM

संचार क्षेत्र आणि भक्ष्य कमी पडत असल्याने वन्यजीव दुसरीकडे धाव घेत आहे. वाघ, बिबट्याच्या भ्रमंतीमुळेच मानव- वन्यजीव संघर्ष वाढला आहे.

ठळक मुद्देगडचिरोली, ताडोबा, गाेंदिया संवेदनशील

गणेश वासनिक

अमरावती : मनुष्य जंगलाकडे तर वन्यजीव नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहे. परिणामी मानव- वन्यजीव संघर्षाचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: विदर्भात मानव- वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला असून, एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात २५ जणांना लक्ष्य करण्यात आले आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने वन विभागाने चिंता व्यक्त केली आहे.

विदर्भातीलवाघांच्या भ्रमंती मार्गाचे कॉरिडॉर बदलत आहे. ताडोबा- अंधारी, मध्य चांदा येथील वाघ यवतमाळ जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे. तर यवतमाळच्या टिपेश्वर येथील वाघ किनवटच्या जंगलाकडे धाव घेत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघ, बिबट हे सातपुडा पर्वत रांगेतून काटेपूर्णा, अकाेला, वाशिमपर्यंत स्थिरावत आहेत. पांढरकवडा, अमरावती वन विभागातील वाघांनी नवे संचार मार्ग शोधले आहे. गडचिरोली भंडारा, गोंदियातील वाघ हे नागपूर, काटोल, कळमेश्वरच्या जंगलात येत आहे. संचार क्षेत्र आणि भक्ष्य कमी पडत असल्याने वन्यजीव दुसरीकडे धाव घेत आहे. वाघ, बिबट्याच्या भ्रमंतीमुळेच मानव- वन्यजीव संघर्ष वाढला आहे. त्यामुळे वन खात्याने यवतमाळ, नागपूर येथे नव्याने रेस्क्यू पथक स्थापन केले आहे.

येथेही मानवाला मृत्यू ओढवले

- ताडोबा येथील टी-१ नामक वाघाने २०२० मध्ये अमरावतीच्या मंगरुळ दस्तगीर येथील एका शेतकऱ्याला ठार केले होते.

- यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्यात येथे २०१९ मध्ये अवनी नामक वाघिणीने १३ जणांना ठार केले होते.

- बुलडाणा जिल्ह्यात वाघ, अस्वलीच्या हल्ल्यात तीन जणांना मृत्यू ओढवला.

- भंडारा, गोंदिया, गडचिरोलीतही मनुष्यावर वन्यजीवांचे हल्ले निरंतर सुरू आहे

चंद्रपूर जिल्ह्यात पोस्टींग नको?

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक वनसंपदा आहे. चंद्रपूर ही वन विभागाची काशी मानली जाते. येथे नव्या आयएफएस अधिकाऱ्याना बरेच काही शिकता येते. मात्र, मानव- वन्यजीव संघर्ष वाढत असल्याने येथे वन अधिकारी नियुक्ती होऊ नये, यासाठी लॉबिंग करतात. वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांनी चंद्रपूर, गङचिरोली जागत आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष कमी व्हावा आणि जंगलालगतच्या नागरी वस्त्यांमध्ये सुरक्षितता प्रदान करण्याच्या अनुषंगाने अमरावतीत १० मे रोजी राज्यातील वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यात मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला. रेस्क्यू पथकही गठित केले आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र

टॅग्स :forest departmentवनविभागTigerवाघDeathमृत्यूSocialसामाजिकVidarbhaविदर्भ